अकोट : अकोट पोलीस विभागामार्फत कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या अनेक जनावरांची सुटका करून त्यांना जीवनदान दिले जात असल्याचे समोर आले आहे. जप्त करण्यात आलेली ही जनावरे पुढील देखभालीसाठी अकोट येथील गोरक्षण संस्थेकडे सुपूर्द केली जातात. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू असून, हजारो गोवंश गोरक्षणमध्ये सांभाळले जात असल्याचे सांगितले जाते.
गोरक्षण संस्थेमार्फत या जनावरांना चारापाणी, निवारा आणि वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात. अनेक दानदातेही पुढाकार घेऊन या गोवंशांच्या संगोपनासाठी मदत करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कत्तलीच्या तावडीतून सुटलेल्या जनावरांना सुरक्षित जीवन मिळत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते.
Related News
अकोट जिल्हा परिषद शाळेत घाणीचे साम्राज्य ,आवार भिंत पडली विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर धोका
धक्कादायक! उमरा गावात चवताळलेल्या माकडाचा हैदोस; 10 दिवसांत 3 जण जखमी
ऑपरेशन प्रहार : अकोटजवळ जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ७.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त
हिदायत पटेल हत्याकांडात मोठी घडामोड; अकोट सत्र न्यायालयाकडून ४ फरार आरोपींविरुद्ध अटक वॉरंट
अकोटमध्ये करंट लागून म्हशीचा मृत्यू, धारूर गावातील दुर्दैवी घटना; शेतकऱ्याला मदतीची मागणी
१० वैशिष्ट्यांसह श्री संत वासुदेव महाराज पालखीचे भव्य प्रस्थान; हरिनामाच्या गजरात आकोटकरांचा अविस्मरणीय आनंदोत्सव
“भीषण उन्हात अकोट-कुटासा बस बंद! प्रवाशांचे 5 धक्कादायक हाल, एसटी प्रशासनावर संतापाचा भडका”
युरिया खरेदीसाठी आता सातबारा अनिवार्य; अकोटमध्ये रांगा ओसरल्या
7 तास उन्हात ताटकळत उभे शेतकरी! सावरा येथे युरिया खतासाठी भीषण रांगा, बळीराजाचा संताप अनावर
धक्कादायक! अकोट आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य; 15 लाखांच्या ठेक्यानंतरही व्यापाऱ्यांचा संताप
मात्र, याच पार्श्वभूमीवर आता काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रशासनाने जप्त करून गोरक्षणच्या ताब्यात दिलेली सर्व जनावरे आजही सुरक्षित आणि अस्तित्वात आहेत का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. शहरात दबक्या आवाजात अशी चर्चा सुरू आहे की, काही वर्षांपूर्वी सुपूर्द केलेली सर्व जनावरे सध्या गोरक्षणमध्ये उपलब्ध नाहीत.
गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून जप्तीतील जनावरे सुपूर्दनाम्यावर गोरक्षणकडे देण्यात येत आहेत. मात्र, त्या जनावरांची नियमित पडताळणी झाली आहे का, हा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेऊन गोरक्षणला प्रत्यक्ष भेट देऊन नोंदी, सुपूर्दनामे आणि प्रत्यक्षातील जनावरांची संख्या याची सखोल तपासणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, पारदर्शकता आणि विश्वास टिकवण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर चौकशी करावी, अशी अपेक्षा अकोटकर नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
