अकोट, दि. : आगामी मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अकोट ग्रामीण पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
मोहरम सण शांतता, सौहार्द आणि बंधुत्वाच्या वातावरणात पार पडावा, या उद्देशाने पोलिस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. रूट मार्चदरम्यान प्रमुख मार्ग, संवेदनशील भाग तसेच धार्मिक स्थळांच्या परिसराची सखोल पाहणी करण्यात आली.
या वेळी पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, कोणतीही संशयास्पद बाब दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे सांगितले. उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
Related News
पिंपरीत 7 भटक्या कुत्र्यांचा 5 वर्षीय चिमुरडीवर भीषण हल्ला; 46 सेकंद लचके तोडले, शरीरावर 90 टाके
तुकाराम मुंढेंनी मित्रांसाठी स्वतः बनवला चहा, देशभरातून होतंय कौतुक! 1 व्हिडीओने जिंकली मनं!
Baramati विमानतळ हादरलं! प्रशिक्षण विमानाचा अपघात, धक्कादायक VIDEO समोर
नाशिक-पुणे रेल्वेसाठी समृद्धी महामार्ग रोखला; सत्यजित तांबे ताब्यात, आंदोलन मात्र सुरूच!
अकोला शिक्षक बदली घोटाळा: 33 शिक्षक निलंबित, 65 जणांची वेतनवाढ रोखली | 136 दोषींवर मोठी कारवाई
5 वर्षांत 3 कोटींचे बेडशीट-टॉवेल चोरी; रेल्वेतील धक्कादायक प्रकाराने प्रशासन हादरले
मोहरम उत्सव सर्व धर्मीय नागरिकांनी शांतता आणि उत्साहात साजरा करावा, तसेच प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन अकोट ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आले आहे.
