अकोट तालुक्यातील पिंप्री खुर्द ते करी या मार्गावरील रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू असल्याने नागरिक, वाहनधारक आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. कंत्राटदाराकडून कामाला अपेक्षित वेग दिला जात नसल्याने रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
रस्त्यावर अनेक ठिकाणी मुरूम व गिट्टी टाकून ठेवण्यात आली असून त्यावरून वाहन चालवणे धोकादायक ठरत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे किरकोळ तसेच गंभीर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून काही जणांना कायमचे अपंगत्व आल्याचीही माहिती नागरिकांनी दिली.
सध्या शेतीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांना याच मार्गाने शेतात ये-जा करावी लागते. मात्र, रस्त्यावरील खडी-मुरूमामुळे ट्रॅक्टरसह इतर वाहने अडकत आहेत. तसेच गुरे चारण्यासाठी जाणाऱ्या पशुपालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत असून काही जनावरांच्या पायांना गिट्टी लागून जखमा झाल्या आहेत.
Related News
IMD चा मोठा इशारा! पुढील 96 तास मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यांचा तडाखा
Ladki Bahin Yojana : पात्र असूनही पैसे नाहीत? बच्चू कडू आक्रमक, 30 जूनची मुदत
नव्याने निवडून आलेल्या दोन नगरसेवकांच्या जात वैधतेवर आक्षेप; प्रकरण जात पडताळणी समितीकडे!
शिवराज्याभिषेकाचे स्मरण करत शेंदूरजनमध्ये वृक्षारोपणाचा संकल्प; पाहुण्यांना ताट-वाट्यांचे विनामूल्य वाटप
मोठा राजकीय धक्का! संजय राठोडांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या 100 हून अधिक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
353 व्या शिवराज्याभिषेकानंतर दुर्दैवी घटना! साताऱ्याच्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू
3 निष्पाप विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत! साई टेकडी तलावातील हृदयद्रावक दुर्घटनेने छत्रपती संभाजीनगर हादरले
शिर्डी अपघात प्रकरणातील 5 धक्कादायक तथ्ये; मदतीसाठी न थांबल्याने ST चालक-वाहकांवर कारवाईची तलवार
LPG Price Hike 2026 : 5 मोठे धक्कादायक बदल! LPG महागल्यानंतर PNG ग्राहकांनाही बसणार फटका?
मद्यधुंद ट्रक चालकाचा 2 किमी मृत्यूचा खेळ; बारामतीत भीषण अपघात टळला !
50% वाढणार वांद्रे टर्मिनसची क्षमता! मुंबईसाठी ऐतिहासिक आणि गेमचेंजर ठरणार मोठा विस्तार प्रकल्प
हा मार्ग सध्या ‘मृत्यूचा महामार्ग’ बनल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. रखडलेले काम तातडीने पूर्ण करून सुरक्षित व सुकर वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
