अकोट तालुक्यातील पिंप्री खुर्द ते करी या मार्गावरील रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू असल्याने नागरिक, वाहनधारक आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. कंत्राटदाराकडून कामाला अपेक्षित वेग दिला जात नसल्याने रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
रस्त्यावर अनेक ठिकाणी मुरूम व गिट्टी टाकून ठेवण्यात आली असून त्यावरून वाहन चालवणे धोकादायक ठरत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे किरकोळ तसेच गंभीर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून काही जणांना कायमचे अपंगत्व आल्याचीही माहिती नागरिकांनी दिली.
सध्या शेतीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांना याच मार्गाने शेतात ये-जा करावी लागते. मात्र, रस्त्यावरील खडी-मुरूमामुळे ट्रॅक्टरसह इतर वाहने अडकत आहेत. तसेच गुरे चारण्यासाठी जाणाऱ्या पशुपालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत असून काही जनावरांच्या पायांना गिट्टी लागून जखमा झाल्या आहेत.
Related News
Maharashtra Bandh : दिल्लीतील लाठीचार्जचे महाराष्ट्रात पडसाद; प्रकाश आंबेडकरांची ‘महाराष्ट्र बंद’ची हाक
Maharashtra Rains : महाराष्ट्रात धो-धो पाऊस! पालघरमध्ये पूरस्थिती, 16 गावांचा संपर्क तुटला; शाळांना सुट्टी
CJP Protest : विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी दिल्ली पोलिसांना हाय कोर्टाची नोटीस; CCTV फुटेज जतन करण्याचे आदेश
Rahul Gandhi : ‘मुलींना मारलं, अंगावर छर्रे लागले’; दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
Manoj Jarange Patil : ‘जंतर-मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार’; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Delhi Metro : मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद; पुढील आदेशापर्यंत प्रवेश-एक्झिटला ब्रेक
NEET पेपरफुटीवर कतरिना गप्प का? नाराज चाहत्यांनी कतरिनाला अनफॉलो करण्याचा घेतला निर्णय
मोठी बातमी! विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप; दिल्ली पोलिसांनी दिलं धक्कादायक स्पष्टीकरण
Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! आज दुपारी 3 वाजता कर्जमाफीची पहिली यादी जाहीर
सर्वात मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदींसोबत भेट; विद्यार्थी आंदोलनावर झाली मोठी चर्चा?
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मोदी सरकार का घेत नाही? समोर आली ‘ही’ 5 मोठी कारणं!
हा मार्ग सध्या ‘मृत्यूचा महामार्ग’ बनल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. रखडलेले काम तातडीने पूर्ण करून सुरक्षित व सुकर वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
