अजिंक्य भारत प्रतिनिधी | जानोरीमेळ
निंबा अंदुरा सर्कलमधील गजबजलेल्या मोखा गावात जानोरीमेळ गट ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार कारभाराचा प्रत्यय
सध्या ग्रामस्थांना येत आहे. ऑक्टोबर २०२४ पासून ग्रामपंचायतीच्या कचरा पेट्या
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
विद्यमान सरपंचांच्या घरी धूळ खात पडून आहेत. सहा महिन्यांनंतरही या पेट्यांचे अद्यापही वितरण झालेले नाही.
ग्रामसेवकाशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली की, “मोखा आणि जानोरीमेळ या दोन्ही
गावांमध्ये कचरा पेट्यांचे वाटप होणे बाकी आहे. जानोरीमेळसाठी स्वतंत्र घंटागाडी
आणण्याची प्रक्रिया गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे.
येत्या २५ ते २७ एप्रिलदरम्यान पेट्यांचे घरोघरी वितरण केले जाणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
घंटागाडी वापराबाहेर, अपंग निधीही रखडला
सदर ग्रामपंचायतीने आणलेली घंटागाडीही सद्यस्थितीत निष्क्रिय आहे.
यासंदर्भात ग्रामसेवकांनी सांगितले की, “ग्रामपंचायतीचा एक
कर्मचारी अपघातग्रस्त झाल्यामुळे या वितरण प्रक्रियेला विलंब झाला.”
तसेच, अपंग नागरिकांसाठी असलेला शासनाचा निधीही अद्याप वितरित झालेला नाही.
या निधीचे वितरणही कचरा पेट्यांप्रमाणे पुढील आठवड्यातच करण्याचे आश्वासन ग्रामसेवकांनी दिले.
ग्रामस्थांमध्ये नाराजी, कारवाईची मागणी
या संपूर्ण प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “सार्वजनिक सुविधांसाठीचा निधी
आणि साहित्य जर अशा प्रकारे ठेवून दिला जाणार असेल,
तर ग्रामपंचायत प्रशासनाची कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं,”
अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
Read Also :
https://ajinkyabharat.com/avakali-pavasacha-vanisah-complex-tadakha/