अकोट शहरातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.
केवळ “मुलाकडे आई अधिक लक्ष देते” या कारणावरून एका ९ वर्षांच्या निष्पाप मुलाचा निर्दय खून करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
ही घटना २ जुलै रोजी अकोट तालुक्यातील कवठा येथे घडली.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
वैयक्तिक दु:खातून क्रौर्यापर्यंतचा प्रवास
मुक्ता उर्फ लक्ष्मी शिराळकर या महिलेचा पहिला पती वैभव पळसकर याने आत्महत्या केल्यानंतर ती आपल्या दोन मुलांसह मायच्या घरी परतली होती.
अकोटमधील मॉलमध्ये काम करत तिने संसार सावरण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, तिची ओळख आकाश कान्हेकर या युवकाशी झाली आणि ६ महिन्यांपूर्वी दोघांचा प्रेमविवाह झाला.
मात्र, संसार काही टिकला नाही. सततच्या वादांना कारण ठरले दर्शन – तिचा ९ वर्षांचा मुलगा.
निर्दयी हत्येची थरकाप उडवणारी पद्धत
२ जुलै रोजी मुक्ता कामावर गेल्यानंतर आकाशने आपल्या मित्र गौरव गायगोले याला घेऊन दर्शनला दुचाकीवरून जंगलात नेलं.
तिथे त्याचे हातपाय तोडून, पोत्यात भरून मृतदेह फेकून दिला.
दर्शन घरी न परतल्याने मुक्ताने पोलीस ठाण्यात तक्रार केली. उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल
यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आकाश आणि गौरवला अटक करण्यात आली.
मृतकाची आजी सुनंदा शिराळकर म्हणाल्या:
“दर्शन अत्यंत शांत, निरागस मुलगा होता. आईला मदत करायचा. असं काही होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं…”
अनमोल मित्तल, SDPO अकोट म्हणाले:
“आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे. पुरावे जमा करण्यात आले असून गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.”
संतप्त अकोटकरांचा निषेध
या घटनेनंतर अकोटमध्ये सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला.
आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टात शिक्षा व्हावी, मृतक कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
एक आईचा संघर्ष, एक मुलाचा जीव, आणि विकृत रागातून झालेली एक क्रूर हत्या…
संपूर्ण अकोट हादरलंय – आता संपूर्ण लक्ष आहे की, दोषींना किती कठोर शिक्षा होते!
Read Also : https://ajinkyabharat.com/kapashi-rastyavariil-incomplete-service-road/