अडगाव बु. | प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील धोंडा आखर या आदिवासीबहुल गावात प्रधानमंत्री ‘धरती आबा’ जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान प्रभावीपणे राबवण्यात आले.
या अभियानात अनुसूचित जमातीतील नागरिकांसाठी केंद्र सरकारच्या विविध अनुदान योजनांची माहिती देण्यात आली.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
अभियानाच्या माध्यमातून मत्स्यसंवर्धन, तलाव उभारणी, इन्सुलेटेड वाहने, थर्मल आइस बॉक्स,
मोटारसायकल, प्रशिक्षण व जनजागृती यासारख्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
या योजनेंतर्गत ९०% अनुदान व १०% लाभार्थी हिस्सा ठेवण्यात आला असून,
यातील ६०% हिस्सा केंद्र सरकारकडून व ४०% हिस्सा राज्य शासनाकडून दिला जाणार आहे.
अभियानात उपस्थित मान्यवर –
सदर कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच सौ. योगिता भाऊराव पोकळे, ग्रामसेवक मंगेश बुंदे, तलाठी सतीश दांडगे,
कृषी सहाय्यक राजनकार, रोजगार सेवक सुरेश तायडे, कोतवाल वासुदेव वानखडे, उपसरपंच संजयकुमार गवते,
तसेच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा उद्देश –
या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास साधणे, रोजगाराच्या
नव्या संधी उपलब्ध करून देणे आणि शेतीपूरक उपजीविकेचा आधार तयार करणे.
उपस्थित ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता, प्रधानमंत्री धरती आबा अभियानाच्या माध्यमातून
धोंडा आखर गावात सकारात्मक बदल घडवून आणण्याची नांदी झाली आहे.