वणीसह परिसरात दि. 18 ला 5 वाजताच्या दरम्यान पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी
लावली त्यात शहर तसेच परिसरात मोठे नुकसान झाले असून अनेकांचे घराचे टिनपत्रे, वॉटर टँक, झाडे,
कंपनीच्या भिंती, शेड, सुरू असलेल्या यात्रेचे दुकाने, झुले आदींचे मोठे नुकसान झाले आहे.
Related News
सततच्या पावसामुळे तीन वेळा पेरणी वाया; शेतकऱ्यांचा आक्रोश, नुकसानभरपाईची मागणी
देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक;
कोकणात मुसळधार पावसाचा हाहाकार;
प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडने नोंदविला अकोल्यात निषेध.
मध्यप्रदेशातून पोटाची खडगी भरण्यासाठी आलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू; कुरणखेडमध्ये हळहळ
विदर्भ स्तरीय अभया परिषद उत्साहात संपन्न, कार्यकर्ता तुषार हांडे सन्मानित.
पिकविमा मंजूर तरीही थकलेली रक्कम; शेतकऱ्यांचा संताप, कृषी अधिक्षकांना निवेदन
अकोट रोटरी क्लब चा शपथग्रहण सोहळा संपन्न
“ऑपरेशन प्रहार”ची मोठी कारवाई: अकोल्यात जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांवर कारवाई, ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
राज ठाकरे अडचणीत? वरळीतील वक्तव्यावरून DGPकडे तक्रार दाखल
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
काही दिवसा आगोदर जणू सूर्य आग ओकत असल्याचा भास जनसामान्यांना होत होता,
दुपारचा उकाळा पाहून रस्त्यावरील रेलचेल कमी झाली होती.
दि. 18 ला सायंकाळच्या दरम्यान अचानक वादळी वारा सुरू झाला अन् वणी सह परिसरात वादळी
वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. सायंकाळी 5 ते 7 या दरम्यान पावसाने सर्वसामान्यांना चांगलाच फटका दिला.
यात काहींच्या घरचे टीन पत्रे, शहर व परिसरातील झाडे पडली, वॉटर टँक उडाल्या, बॅनर फाटले,
तर भालर येथील रॉकवेल मिनरल व हारमोनी कंपनीच्या भिंती पडून परिसरात व मशनरीत पाणी शिरल्याने कंपनीला मोठे
नुकसान झाले यात त्यांचे अंदाजे दिड करोडाचे नुकसान झाल्याचे हुसैन बादशाह यांनी सांगितले.
तसेच श्री रंगनाथ स्वामी यात्रा सुरू असून याचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
दुकानांचे छप्पर उडाले काहींचे संपूर्ण दुकाने पडली असुन, झुल्या चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
त्यांचे अं. सात लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
या अवकाळी पावसाचा फटका शेतीला मोठ्या प्रमाणात बसला असुन ज्यांचे
शेतमाल निघायचा होता त्यांच्या शेत मालाचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे शेतकरी सुधा हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला
असून परिसर थंड झाल्याने तर काही ठिकाणी शिरवा पाऊस झाल्याने
थंडीच्या प्रमाणात वाढ होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/daheigav-case-prohibited-telhara-city-closed-market/