बोरगाव मंजू | प्रतिनिधी
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त परशुराम नाईक विद्यालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित कार्यक्रमात सादर करण्यात आलेले तंबाखू मुक्त पथनाट्य हे समाजप्रबोधनात्मक असून त्यातून प्रभावी जनजागृती होते,
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
असे गौरवोद्गार जिल्हा दिवाणी न्यायाधीश (उच्च स्तर) श्रीमती आर. एन. बंसल यांनी काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष किरणभाऊ नाईक होते.
व्यासपीठावर ठाणेदार अनिल गोपाळ, लोकअभिरक्ष श्री एन. आर. उंबरकर, अॅड. अक्षय डोंगरे, अॅड. उन्हाळे,
शाळा समितीचे अध्यक्ष दीपकभाऊ नाईक, संस्था सचिव एन. एस. गमे, मुख्याध्यापक मनोज आगरकर,
उपमुख्याध्यापक गजानन पोहनकर, पर्यवेक्षक शंकर भदे आदी मान्यवर उपस्थित होते.
अमली पदार्थांविरोधात कायदेविषयक मार्गदर्शन
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अमली पदार्थ तस्करी प्रतिबंधक कायदे,
POCSO कायदा आणि त्यांचे समाजातील महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या तंबाखू व अमली पदार्थविरोधी पथनाट्याचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
उत्कृष्ट अभिनयाबद्दल प्रा. वासुदेव डांगे, प्रा. रमेश भड आणि विद्यार्थ्यांचा न्यायाधीश आर. एन. बंसल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना संदेश
किरणभाऊ नाईक यांनी अध्यक्षीय मनोगतात अमली पदार्थांचे दुष्परिणाम उलगडून सांगत विद्यार्थ्यांना सजग राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रमेश भड यांनी केले तर आभार प्रा. आशिष बोरोडे यांनी मानले.
यावेळी प्राचार्य प्रणाली अंबरते, प्रा. गजानन कंकाळ, विक्रमसिंग पवार, वैशाली राय आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीकृष्ण बागडे, कैलास गोवर्धने, सय्यद उमेर, विकी बागडे, भूषण खापरकर, उमेश गावंडे आदींनी मोलाचे योगदान दिले.
Read Also : https://ajinkyabharat.com/bordi-grampanchayati-bhang/