अकोट | प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील धामणा बुद्रुक गावात कॉलराचा उद्रेक झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
विष्णू बद्रे या ५० वर्षीय इसमाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला असून,
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
प्रयोगशाळेच्या अहवालानुसार ते कॉलराने बाधित होते, हे स्पष्ट झाले आहे.
या घटनेनंतर आरोग्य विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या असल्या तरी, एक नागरिक गमावल्यानंतरच यंत्रणा जागी झाली,
अशी तीव्र नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीमुळेच हा बळी गेला.
गावात प्रतिबंधात्मक उपाय सुरू
घटनेनंतर धामणा गावात कॉलराचा अधिकृत उद्रेक जाहीर करण्यात आला असून,
आरोग्य विभागाच्या ४ पथकांद्वारे घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे.
गावात सध्या ८० घरे असून, सर्व घरांची तपासणी करण्यात आली आहे.
पिण्याच्या पाण्यावर भर
गावकऱ्यांना पाणी उकळून पिण्याचे, आर.ओ. पाणी किंवा मेडिक्लोर वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
करोडी उपकेंद्रामार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत.
गावात आरोग्य शिक्षणाचे कामही सुरू असून, डायरिया व कॉलरासदृश लक्षणांकडे तातडीने लक्ष देण्यात येत आहे.
ग्रामस्थांची मागणी
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे दूषित पाण्यामुळे कॉलराचा प्रादुर्भाव झाला, असा आरोप करत,
जलस्रोतांची तातडीने स्वच्छता करण्याची व नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
“आरोग्य विभागाने वेळेवर लक्ष दिलं असतं, तर माझ्या पतीचा जीव वाचला असता,”
– बद्रे कुटुंबीयांची प्रतिक्रिया.
या प्रकरणानंतर आरोग्य विभागाकडून सतर्कतेचे निर्देश देण्यात आले असून,
पुढील काही दिवस गावात विशेष देखरेख ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/ridhora-nag-prajaticha-venivar-sap-gharat-aadhala/