श्रीकांत पाचकवडे, अकोला |
ता. १७ एप्रिल — ग्रामीण विकासाचा मेरूमणी समजल्या जाणाऱ्या अकोला
जिल्हा परिषदेचा कारभार सध्या अक्षरशः रामभरोसे झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
Related News
Weather Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! पुढील दहा तासांत मुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट जारी
महाराष्ट्रातील नागरिकांसह शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आ...
Continue reading
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! IRCTC वेबसाइटमध्ये होणार मोठा बदल; तत्काल तिकीट बुकिंग होणार सुपरफास्ट
भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाश...
Continue reading
लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! खात्यात जमा होऊ लागले 1500 रुपये; 3000 रुपयांच्या चर्चांवरही आली मोठी अपडेट
महाराष्ट्र सरकारच्या म...
Continue reading
एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगची झंझट संपणार! आता कनेक्शनशिवाय मिळणार सिलिंडर, 5 मिनिटांत घरपोच सेवा सुरू
घरगुती गॅस सिलिंडर संपल्यानंतर बुकिंग करणे, न...
Continue reading
विनायक राऊतांच्या अडचणीत वाढ! गिरिजा राऊत प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्...
Continue reading
रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’चा जगभरात डंका! नेटफ्लिक्सवर नॉन-इंग्रजी चित्रपटांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर; 192 देशांतील प्रेक्षकांची पसंती
Continue reading
शरद पवारांचे खासदार शिवसेनेत येणार? चर्चांवर एकनाथ शिंदेंचं स्पष्ट उत्तर; ‘ना त्यांनी संपर्क केला, ना मी’
शरद पवारांचे खासदार शिवसेनेत येणार? चर्चांवर एकन...
Continue reading
मोठी बातमी! शिंदेंचं ‘ऑपरेशन टायगर’ नाशिकात फसलं? उद्धव ठाकरेंसमोर 15 नगरसेवकांची एकजूट; 5 कोटींच्या ऑफरचाही गौप्यस्फोट
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच शिवसेना (
Continue reading
Oil Crisis : जगावर पुन्हा तेलसंकटाचे सावट; स्वतःकडे मर्यादित कच्चे तेल असूनही भारत ठरणार जगासाठी महत्त्वाचा आधार, जाणून घ्या कारण
मध्यपूर्वेतील वाढता संघर्ष, इराण-अमेरिका तणाव आणि...
Continue reading
Monsoon Diet Tips : पावसाळ्यात ‘या’ भाज्या खात असाल तर व्हा सावध! पोटाचे गंभीर आजार टाळण्यासाठी जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
पावसाळा सुरू होताच वातावरण...
Continue reading
Aamir Khan Third Marriage : 'मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे'; आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरील टिप्पणीबाबत नितेश राणेंचं स्पष्टीकरण
बॉलिवूड अभिनेता आमिर खान ...
Continue reading
Soft Roti Tips : चपात्या तव्यावरून काढताच कडक होतात? ना जास्त तेल, ना फक्त पाणी; कणिक मळताना ‘हे’ दोन पदार्थ वापरा, पोळ्या दिवसभर राहतील मऊ
अनेक घरांमध्ये सकाळी बनवलेल्या चपात्या ...
Continue reading
सोमवारी (ता. ७) जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना दिलेल्या अचानक भेटीत अनेक अधिकारी व कर्मचारी
कार्यालयीन वेळेत त्यांच्या कक्षात अनुपस्थित असल्याचे उघड झाले.
यामुळे आपल्या कामांसाठी जिल्हा परिषदेच्या दारात ताटकळत बसणाऱ्या ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण, बांधकाम, लघुसिंचन, कृषी,
पाणीपुरवठा व पशुसंवर्धन आदी विभागांतील काही कर्मचारी नेहमीच गैरहजर असल्याच्या तक्रारी आहेत.
सीईओंची बदली, शिस्त गडगडली
गेल्या काही महिन्यांत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी बी.
वैष्णवी यांनी वेळकाढूपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वचक ठेवत प्रशासन रुळावर
आणण्याचा प्रयत्न केला होता. अचानक भेटी, दंडात्मक कारवाई आणि स्पष्ट धोरणामुळे कर्मचारी
वेळेवर कार्यालयात हजर राहू लागले होते. मात्र, नुकतीच
त्यांची नागपूर महापालिकेत अप्पर आयुक्त पदावर बदली
झाल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी पुन्हा दांडगी शिस्त दाखवायला सुरुवात केली आहे.
टपऱ्यांवर अधिकाऱ्यांची गर्दी
अनेक कर्मचारी बायोमॅट्रिक हजेरी लावून कार्यालयात बसण्याऐवजी जिल्हा परिषद परिसरात फिरताना,
तर काहीजण चहाच्या टपऱ्या व पानपट्टीवर आढळून येतात.
त्यामुळे कामासाठी आलेल्या ग्रामस्थांना त्यांच्या शोधात भटकावे लागते.
कक्षात कर्मचारी नसल्यास “साहेब आत्ताच गेलेत”,
“जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेलेत” अशा स्वरूपाची थातूरमातूर उत्तरे देऊन दिशाभूल केली जाते.
विजेचा अपव्ययही सुरूच
अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असतानाही त्यांच्या कक्षांतील लाईट व पंखे सुरू ठेवले जात
असल्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेचा अपव्यय होत आहे. ही बाब देखील वरिष्ठ प्रशासनासाठी गंभीर चिंतेचा विषय आहे.
जनतेचा सवाल : जबाबदार कोण?
कार्यालयात वेळेवर उपस्थित राहणे ही किमान जबाबदारी असतानाही अनेक कर्मचारी
ती पार पाडताना अपयशी ठरत आहेत. परिणामी ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचे प्रश्न अनुत्तरीत राहतात.
याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन शिस्तीचे धोरण पुन्हा लागू करावे,
अशी मागणी आता जनतेकडून होऊ लागली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/sudaiwane-jeevhani-tali/