नवी दिल्ली /
अकोला — “उर्दू ही एक लोकभाषा आहे, ती कोणत्याही विशिष्ट धर्माशी जोडलेली नाही.
तसेच, मराठीबरोबर उर्दूचा वापर करण्यावर कोणताही कायदेशीर प्रतिबंध नाही,
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
” अशा स्पष्ट शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने अकोला जिल्ह्यातील पातूर
नगरपालिकेला उर्दू फलक लावण्यास विरोध करणारी याचिका फेटाळून लावली आहे.
भाषिक विविधतेचा सन्मान आवश्यक – सर्वोच्च न्यायालय
न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने या निकालात म्हटले आहे की,
भाषिक विविधतेचा सन्मान करणे हे लोकशाहीतील मूलभूत तत्त्व आहे. त्यामुळे उर्दू अथवा इतर कोणत्याही
भाषेचा मराठीसह वापर केल्यास ते महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण (अधिकृत भाषा) कायद्याचा भंग ठरत नाही.
प्रकरणाची पार्श्वभूमी
अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपालिकेच्या इमारतीवर लावण्यात आलेल्या
फलकावर मराठीबरोबर उर्दू भाषेचा वापर करण्यात आला होता.
याविरोधात पातूर नगरपालिकेच्या माजी नगरसेविका वर्षा संजय बागडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
हायकोर्टाने या फलकाच्या वापरास परवानगी दिल्यानंतर त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, उर्दूवर कोणतीही बंदी नाही आणि तो फलक कायदेशीर आहे.
भविष्यासाठी सकारात्मक संदेश
या निकालामुळे भाषिक सौहार्द आणि विविधतेचा सन्मान करण्याचा संदेश न्यायालयाने दिला आहे.
न्यायालयाने म्हटले की, “उर्दूसह इतर भाषांशी मैत्री करूया, त्यांचा आदर करूया.
ही आपली सांस्कृतिक समृद्धी आहे.”
Read Also : https://ajinkyabharat.com/charita-training-atmchi-facility-fast-cash-express/