पारंपरिक शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
कधी निसर्ग साथ देत नाही, कधी बाजारभाव कोसळतो – परिणामी उत्पन्नात घट होते.
पण अकोल्याच्या दिग्रस गावातील एका महिला शेतकऱ्याने हे चित्र पूर्णपणे बदलून टाकलं आहे.
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
उर्मिला शेलगावकर यांनी पारंपरिक पिकांना बाजूला ठेवत कलिंगडाच्या शेतीत यशाचं पाणी पाजलं आहे.
केवळ एका एकरातून त्यांनी अडीच लाखांचं उत्पन्न घेतलंय. पाहूया त्यांची ही यशोगाथा..
पातूर तालुक्यातील दिग्रस येथील महिला शेतकरी उर्मिला जगन्नाथ शेलगावकर यांचं कार्य
आज पश्चिम विदर्भातील अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
त्यांनी एका एकरात कलिंगडाची लागवड करून, योग्य नियोजन,
मशागत आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनानं अवघ्या 75 दिवसांत अडीच लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे.
आणि अजूनही 25 ते 30 हजारांचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे.
प्रत्येक कलिंगड सरासरी 6 ते 7 किलो वजनाचं असल्याने, त्यांच्या मालाला बाजारात मोठी मागणी आहे.
यशामागे नियमित पीकनिरीक्षण, आंतर मशागत आणि बाजारपेठेचा अभ्यास यांचा मोठा वाटा आहे.
याच आत्मविश्वासातून त्यांनी आता आणखी दोन एकरांत कलिंगडाची लागवड सुरू केली आहे.
विशेष म्हणजे उर्मिला या एम.ए., बी.एड. शिक्षण घेतलेली असूनही नोकरीचा माग नाही धरला,
शेती व्यवसायात पाऊल टाकून त्यांनी स्वतःचं एक स्वतंत्र स्थान निर्माण
उर्मिला यांच्या या प्रवासात त्यांचे पती, जगन्नाथ शेलगावकर, हे कायम त्यांच्या सोबत उभे राहिले.
शेतीतील प्रत्येक निर्णयात उर्मिलांची भूमिका निर्णायक असली,
तरी या वाटचालीत पती-पत्नीने एकत्र शेती करणं ही त्यांची यशाची गुरुकिल्ली ठरली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/sanandancha-dhikhi-karyancha-nationalist-ajit-pawar-middle-admission/