पारंपरिक शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
कधी निसर्ग साथ देत नाही, कधी बाजारभाव कोसळतो – परिणामी उत्पन्नात घट होते.
पण अकोल्याच्या दिग्रस गावातील एका महिला शेतकऱ्याने हे चित्र पूर्णपणे बदलून टाकलं आहे.
Related News
“सीजेआय पदाची शपथ घेण्याआधी आईचं आशीर्वाद घेतलं”
“भारताच्या अटींवरच उत्तर मिळेल; ऑपरेशन सिंदूरनंतर आदमपूरवरून मोदींचा संदेश”
“सरन्यायाधीशांच्या मातोश्रींचा स्पष्ट सूर : ‘बॅलेट पेपरच सुरक्षित, मतदारांचा विश्वास जपणं गरजेचं'”
दहावी नापास? चिंता नको! आता अकरावीमध्ये प्रवेशाचा मार्ग खुला
महागाईने झोप उडवली! वाढलेल्या दरांमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले, प्रवासही महागला
देशविरोधी बोललं तर बाय-बाय!” – पाकिस्तानी कलाकारांना भारतातून हद्दपार करण्याचा निर्णय
जिवंत विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने ३ जनावरांचा मृत्यू;
वैशाख पोर्णिमेच्या लख्ख प्रकाशात काटेपूर्णा अभयारण्यात प्राणी गणना
मान्सून अंदमानात दाखल! महाराष्ट्रात ६ जूनला होणार एंट्री
शोपियांमध्ये पहाटे अतिरेकी चकमक
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड
CBSE बारावी निकाल जाहीर,
उर्मिला शेलगावकर यांनी पारंपरिक पिकांना बाजूला ठेवत कलिंगडाच्या शेतीत यशाचं पाणी पाजलं आहे.
केवळ एका एकरातून त्यांनी अडीच लाखांचं उत्पन्न घेतलंय. पाहूया त्यांची ही यशोगाथा..
पातूर तालुक्यातील दिग्रस येथील महिला शेतकरी उर्मिला जगन्नाथ शेलगावकर यांचं कार्य
आज पश्चिम विदर्भातील अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
त्यांनी एका एकरात कलिंगडाची लागवड करून, योग्य नियोजन,
मशागत आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनानं अवघ्या 75 दिवसांत अडीच लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे.
आणि अजूनही 25 ते 30 हजारांचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे.
प्रत्येक कलिंगड सरासरी 6 ते 7 किलो वजनाचं असल्याने, त्यांच्या मालाला बाजारात मोठी मागणी आहे.
यशामागे नियमित पीकनिरीक्षण, आंतर मशागत आणि बाजारपेठेचा अभ्यास यांचा मोठा वाटा आहे.
याच आत्मविश्वासातून त्यांनी आता आणखी दोन एकरांत कलिंगडाची लागवड सुरू केली आहे.
विशेष म्हणजे उर्मिला या एम.ए., बी.एड. शिक्षण घेतलेली असूनही नोकरीचा माग नाही धरला,
शेती व्यवसायात पाऊल टाकून त्यांनी स्वतःचं एक स्वतंत्र स्थान निर्माण
उर्मिला यांच्या या प्रवासात त्यांचे पती, जगन्नाथ शेलगावकर, हे कायम त्यांच्या सोबत उभे राहिले.
शेतीतील प्रत्येक निर्णयात उर्मिलांची भूमिका निर्णायक असली,
तरी या वाटचालीत पती-पत्नीने एकत्र शेती करणं ही त्यांची यशाची गुरुकिल्ली ठरली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/sanandancha-dhikhi-karyancha-nationalist-ajit-pawar-middle-admission/