अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरात अनेक दिवसांपासून विनापरवाना सुरू असलेल्या वीट भट्ट्यांकडे महसूल विभागाने डोळेझाक केल्याचे चित्र समोर आले आहे. मात्र, हा प्रकरण प्रसार माध्यमांत येताच प्रशासन अचानक ॲक्शन मोडमध्ये आले आहे. दि. ९ मार्च २०२६ रोजी अकोट तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत, वीट भट्ट्यांची तपासणी व पंचनामा केला.
स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, महामार्गालगत सुरू असलेल्या या भट्ट्यांमुळे वाहनधारकांना व परिसरातील नागरिकांना गंभीर त्रास सहन करावा लागत होता. तपासणीत नोंदवले गेले की, अनेक दिवस बिनधास्तपणे हे व्यवसाय सुरू होते, तरीही प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नव्हते.
तपासणीनंतर तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण यांनी आदेश दिले की, संबंधित वीट भट्ट्यांचे पजावाधारक ३१ मार्च २०२६ पूर्वी शासनाकडे रॉयल्टी भरण्याचे आदेश पाळतील. जर निर्धारित मुदतीत रॉयल्टी भरली नाही, तर दंडात्मक कारवाई करून मालमत्तेवर बोजा लादण्यात येईल.
Related News
कोल्हापूरमध्ये धक्कादायक प्रकार: सावकारावर गंभीर आरोप, 300 अश्लील व्हिडिओंचा संशयित साठा, एकच खळबळ
कोल्हापूर जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि गंभी...
Continue reading
आज अकोल्यात बुवाबाजीविरोधी परिषद; प्रा. श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान ठरणार आकर्षण
अकोला शहरात अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले अस...
Continue reading
मुंबई: मुंबईतील चेंबूर येथील माहूल रोडवर सकल हिंदू समाजाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांनी आपली नाराजी व्यक्त करत माहूल रोड पूर्णपणे ठप्...
Continue reading
कल्याण: कल्याण परिसरातील रिंगरूट रस्त्यावर बुधवारी रात्री एका भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसर हादरला. सायकलिंग करत असलेले प्रसिद्ध उद्योजक श्रीनिवास...
Continue reading
पुणे : महाराष्ट्रात भोंदूगिरी करणाऱ्या बुवा-बाबांच्या प्रकरणाने पुन्हा एकदा चिंतेची लाट निर्माण केली आहे. नाशिकमधील अशोक खरात याच्या लैंगिक अत्याचार ...
Continue reading
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. इयत्ता सहावीत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थिनीवर अज्ञात नराधमाने अचानक
Continue reading
बीड जिल्ह्यातील हिवरा पहाडी येथील अल्पवयीन मुलीवर घडलेल्या धक्कादायक अत्याचार प्रकरणाची मुंबईतून दखल घेतली गेली आहे. राज्य महिला आयो...
Continue reading
अमरावती, 15 मार्च 2026 – अमरावतीत महसूल विभागाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सुरू केलेली धडक कारवाई मोहीम दरम्यान दर्यापूर शहरात मोठ्या प्रम...
Continue reading
दरम्यान, महसूल विभागाचे अनेक दिवस बिनधास्तपणे दुर्लक्ष केल्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे. प्रसार माध्यमांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतरच प्रशासन जागे झाले, अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे. स्थानिक नागरिक आता फक्त पंचनामा न होता, विनापरवाना सुरू असलेल्या वीट भट्ट्यांवर कायमस्वरूपी कारवाई करण्याची मागणी करत आहेत, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या अतिक्रमणांवर निर्बंध घालता येतील.
read also : https://ajinkyabharat.com/arshdeep-singla-t20-world-cup-2026-necessary-reason-to-pay-penalty-after-final-match/