शेंदूरजन, प्रतिनिधी : ग्रामपंचायत शेंदूरजनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन आणि जागतिक पर्यावरण दिन विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी प्रकाश आढाव यांनी केले. त्यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विशद करताना सांगितले की, ६ जून १६७४ रोजी रायगडावर झालेला शिवराज्याभिषेक हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण होता. या घटनेमुळे जनतेमध्ये स्वाभिमान जागृत झाला आणि सर्वसामान्यांच्या हक्कांचे राज्य निर्माण झाले.
यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रत्येक नागरिकाने झाडे लावून ती जगविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले. पर्यावरण रक्षणासोबतच प्लास्टिकमुक्त गावाच्या संकल्पनेलाही चालना देण्यात आली. गावातील लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने ताट, पेले आणि वाट्या विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन वापरानंतर साहित्य जबाबदारीने परत करावे, असे आवाहन करण्यात आले.
Related News
संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश; उमरखेड-महागावात शिवसेनेची ताकद वाढलीराज्याच्या राजकारणात ...
Continue reading
शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर दुर्दैवी घटना; साताऱ्याच्या शिवभक्ताचा अपघाती मृत्यू, सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवररायगड : छत्रपती शिवाजी महाराज...
Continue reading
साई टेकडी तलावातील भीषण दुर्घटना; 6 मित्रांपैकी 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगर शोकसागरातछत्रपती संभाजीनगर शहराला हादरवून टाकणारी एक ...
Continue reading
शिर्डी अपघात प्रकरण: मदतीसाठी न थांबलेल्या लालपरीमुळे चालक-वाहकांवर कारवाईची शक्यता; चौकशीला वेगशिर्डीजवळील सावळी विहीर परिसरात घडलेल्या भीषण अपघाता...
Continue reading
LPG Gas Price Increase : 29 रुपयांची वाढ, जाणून घ्या 4 महत्त्वाचे नियम; तुमचे कनेक्शन बंद होऊ शकते
LPG Price Hike : LPG नंतर PNG च्याही किमती वाढणार? 29 र...
Continue reading
बारामतीत ‘या’ मार्गावर मोठा अनर्थ टळला; मद्यधुंद ट्रक चालकाचा हैदोस, ट्रक पलटी होऊन भीषण अपघात
बारामती तालुक्यातील माळेगाव-कऱ्हावाघज मार्गावर एक अत्य...
Continue reading
50% वाढणार वांद्रे टर्मिनसची क्षमता! मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणारा महत्त्वाकांक्षी विस्तार प्रकल्पमुंबई ही देशाची आर्थिक राजध...
Continue reading
भारताचा जन्मदर 1.9 वर; एलॉन मस्क यांचा धक्कादायक दावा, ‘शिक्षित भारतीयांनी मुलं जन्माला घालणं थांबवलं’नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक लोकसंख्या असले...
Continue reading
परीक्षेतील गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही; NEET पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाई करा : पॅक्टोची मागणी
देशातील सर्वात महत्त्वाच्या स्पर्धात्मक परीक्षांपैकी ...
Continue reading
3000 किलो तर्री पोह्याचा ऐतिहासिक विश्वविक्रम! शेफ विष्णू मनोहरांनी नागपूरचा गौरव जगभर पोहोचवला
नागपूर : खाद्यसंस्कृतीचा सुवर्णक्षण
संत्रानगरी म्हणून ...
Continue reading
कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी सदस्य खुशालराव शिंगणे, शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक नंदकिशोर शिंगणे, विठोबा शिंगणे, विनोद कोठारी, बाळू शिंगणे, भगवानराव शिंगणे, घनश्याम सरडे, साहेबराव लेंडगुते यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगविण्याची सामूहिक शपथ घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश शिंगणे, भगवान जाधव, राजू शिंदे, विष्णू डवके आणि पवन गवई यांनी विशेष परिश्रम घेतले. चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
read also : https://ajinkyabharat.com/draining-the-battery-of-a-mobile-phone-will-spoil-it-or-cause-death-stop-it-immediately-otherwise-you-will-suffer-loss/