अकोला:- १० दिवसापासून उपोषणाला बसलेल्या अकोला औद्योगिक श्रेत्रातील ए डी एम ऍग्रो कंपनीच्या सुरक्षा रक्षकांना स्थानिक
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकाऱ्यांनी उचित न्याय मिळवून दिला.ए डी एम ऍग्रो कंपनीने दि ८ एप्रिल पासून त्यांची सुरक्षा रक्षक पुरवणारी
सेफ ग्रार्ड नामक जुनी कंपनी चे काम बंद करून गुरगाव हरयाणा स्थित पॅराग्रीन नामक कंपनीला
सुरक्षा रक्षक पुरवण्याचे कंत्राट दिले आहे.तश्या बाबतीचे पत्र तिथे मागील १० वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा दिले होते.
Related News
मनभा परिसरात संततधार पावसामुळे दुबार पेरणीचे संकट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
हिंदी जीआरवर सरकारची माघार; ठाकरेबंधूंच्या एकतेमुळे मराठी ताकद उभी – संजय राऊतांचा दावा
हिंदी सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक; “जाधव येऊ देत की कोणीतरी… आम्ही खपवून घेणार नाही!”
अकोला जिल्ह्यात व्यवसाय शिक्षण अधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत
शिक्षण राज्यमंत्री यांच्या हस्ते श्री शिवाजी विद्यालयाच्या गौरी व वैभवीचा सत्कार
बोर्डी ग्राम पंचायत थकित गौण खनिज दंड वसुली प्रकरण गुलदस्त्यात
कुंडामधून गरम पाण्याचा झरा : अद्भुत घटना
पिंजर पोलिसाकडून अमली पदार्थ मिशन उडान दिनानिमित्त विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन
जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त ‘मिशन उडान’ अंतर्गत अकोला पोलिसांकडून भव्य जनजागृती उपक्रम
राजेश्वर मंदिराच्या विकासावरून आरोप-प्रत्यारोप; भाजपाची आमदार पठाण यांच्यावर टीका
दानापुर येथे राजर्षी शाहु महाराज जयंती उत्सव संपन्न
रशियात खासगी दौऱ्यावर गेलेले शशि थरूर; मॉस्कोमध्ये रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
नवीन कंपनीतच जुन्या कर्मचाऱ्यांना समाविष्ट करण्यासाठी कामगार गेल्या १० दिवसापासून फॅक्टरी च्या गेट वर उपोषणाला बसले होते.
आज जसे नवीन कंपनीचे कंत्राट सुरू झाले तसे त्यांनी नवीन कामगार भरती संदर्भात हालचाली सुरू केल्या होत्या.
ह्या बाबीची मनसे कार्यकर्त्यांना माहिती पडताच त्यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना ह्याची माहिती दिली.त्यानंतर मनसे पदाधिकारी ए डी एम ऍग्रो च्या कारखान्यात गेले
असता तिथे कंपनीचे एच आर मॅनेजर चंद्रभुषण शर्मा ह्यांची भेट घेतली व त्यांना सर्व जुने कामगार ह्यांना पुन्हा नवीन कंपनीत समाविष्ट करण्यासाठी मनसे स्टाईल समजावून सांगितले
तसेच त्यांच्या कडून तसे लिहून पण घेतले.त्यानंतर नवीन कंपनी पॅराग्रीनचे संचालक
गुरमीतसिंग ह्यांच्यासोबत कामगारांची बैठक घेऊन त्यांच्या कडून पण कामगारांना आश्वस्त केले की सर्व सुरक्षा रक्षकांना पुन्हा सेवेत कायम ठेवण्यात येईल.
तसेच त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करून देण्यात आली. या वेळी सर्व कामगारांनी जल्लोष केला व मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व स्थानिक पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
ह्यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे,उपजिल्हाध्यक्ष सतीश फाले, अकोला शहर अध्यक्ष सौरभ भगत,मनविसे जिल्हाध्यक्ष रणजित राठोड,
मनविसे तालुकाध्यक्ष सौरभ फाले, उपशहर शुभम कवोकार,मुकेश धोंडफळे, अमोल भेंडारकर,मंगेश देशमुख,निलेश स्वर्गीव,
डॉ प्रसन्न सोनार निलेश आगरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.