“खड्डे बुजवू शकले नाहीत, ते मंदिरासाठी काय निधी आणणार?” – गिरीश जोशी यांचा सवाल
अकोला | राजेश्वर मंदिराच्या ‘ब’ वर्ग दर्ज्यावरून अकोल्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी पश्चिम अकोल्याचे आमदार साजिद पठाण यांच्यावर टीकेची झोड उठवत म्हटलं आहे.
Related News
की, “जे अग्रसेन चौकातील खड्डे बुजवू शकले नाहीत, ते मंदिरासाठी काय निधी आणणार?”
पठाण यांनी अलीकडेच पत्रकार परिषद घेऊन मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून दिल्याचा दावा केला होता.
मात्र, जोशी यांनी हा दावा फेटाळून लावत याआधी आमदार रणधीर सावरकर यांनी दोन वर्षांपासून केलेल्या प्रयत्नांची आठवण करून दिली.
त्यांनी ५० लाखांचा निधी मंजूर करून प्रशासनात पाठपुरावा केल्याचा दावा भाजपाने केला.
जोशींचा सवाल: पठाण यांनी नेमका कुठून निधी आणला? कुठले दस्तऐवज दिले? जनतेसमोर खुलासा करा.
जोशी यांनी हेही नमूद केलं की, “हे सर्व केवळ स्वस्त प्रसिद्धीसाठी चाललेले राजकारण आहे.
” तसेच पठाण यांच्या लोकसभेतील जुन्या ‘विवादास्पद भाषणाची’ आठवणही त्यांनी करून दिली.
अकोल्यात राजेश्वर मंदिराच्या नावाने आता राजकीय श्रेय घेण्याची चढाओढ दिसत असून,
हा विषय सध्या शहरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/danapur-yehe-rajarshi-shahu-maharaj-jayanti-festival-concluded/
