मुंबई :
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर
(PoK) मधील ९ दहशतवादी तळांवर प्रतिहल्ला करत ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे पार पाडले.
Related News
“भारताच्या सहकार्याबद्दल आम्ही ऋणी आहोत”
“भारताविरुद्ध कट रचणाऱ्या अल्पवयीनाची गुजरातमधून अटक;
“मला 2 कोटी मागितले अन् वैष्णवीचा जीव गेला!”
भारतात पुन्हा कोरोनाचा फैलाव,
सोन्याच्या दरात पुन्हा वाढ!
पाकिस्तानसाठी काम करत होते, ज्योती मल्होत्राची मोठी कबुली;
कोकणात मुसळधार पावसाचा कहर!
केदारनाथ ते देहरादूनपर्यंत पावसाचा इशारा!
मान्सूनची चाहूल! राज्यात प्री-मान्सूनची जोरदार हजेरी,
PM Kisan 20वा हप्ता मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांनी 30 मे पूर्वी पूर्ण करा ‘हे’ महत्त्वाचे काम
पावसामुळे मुंबई इंडियन्सचे स्वप्न भंगणार?
उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामावर शिवसेनेचे तीव्र आंदोलन;
या कारवाईच्या काही तासांतच बॉलिवूडमधील अनेक निर्माते ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव चित्रपटासाठी
रजिस्टर करण्यासाठी स्पर्धा करू लागले. या टायटलवर आधारीत चित्रपटाची
अधिकृत घोषणा आता करण्यात आली असून त्यासोबतच वादही उफाळले आहेत.
विवादित घोषणा आणि माफी
ज्येष्ठ निर्माते जॅकी भगनानी यांचे चुलत भाऊ विक्की भगनानी आणि निक्की भगनानी यांनी
‘ऑपरेशन सिंदूर’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट निक्की विक्की भगनानी फिल्म्स आणि
द कंटेंट इंजिनिअर प्रॉडक्शन्स या बॅनरखाली तयार होणार आहे.
दिग्दर्शनाची धुरा नितीन कुमार गुप्ता आणि उत्तम माहेश्वरी सांभाळणार आहेत.
या घोषणेसोबतच प्रसिद्ध फोटोग्राफर विरल भयानीने एक एआय जनरेटेड पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले,
ज्यामध्ये एक महिला सैनिक बंदूक हातात घेऊन उभी आहे. पोस्टरवर “भारत माता की जय – ऑपरेशन सिंदूर” असे लिहिले आहे.
मात्र या घोषणेनंतर सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला गेला.
सामाजिक प्रतिक्रिया आणि तणावाचा प्रश्न
देशात भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरण असताना अशा संवेदनशील विषयावर तातडीने
चित्रपटाची घोषणा करणे गैर असल्याचे अनेकांचे मत आहे. काही जणांनी याला “मेकर्सना केवळ अटेंशन पाहिजे” अशी टीका केली.
विरोधानंतर निर्मात्यांनी माफी मागितली असून, जनभावनांचा आदर करत स्क्रिप्ट
आणि वेळेबाबत फेरविचार केला जाईल, असे स्पष्ट केले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akola-shaharat-vadi-vyasah-viger-paus/