मुंबई :
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर
(PoK) मधील ९ दहशतवादी तळांवर प्रतिहल्ला करत ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे पार पाडले.
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
या कारवाईच्या काही तासांतच बॉलिवूडमधील अनेक निर्माते ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव चित्रपटासाठी
रजिस्टर करण्यासाठी स्पर्धा करू लागले. या टायटलवर आधारीत चित्रपटाची
अधिकृत घोषणा आता करण्यात आली असून त्यासोबतच वादही उफाळले आहेत.
विवादित घोषणा आणि माफी
ज्येष्ठ निर्माते जॅकी भगनानी यांचे चुलत भाऊ विक्की भगनानी आणि निक्की भगनानी यांनी
‘ऑपरेशन सिंदूर’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट निक्की विक्की भगनानी फिल्म्स आणि
द कंटेंट इंजिनिअर प्रॉडक्शन्स या बॅनरखाली तयार होणार आहे.
दिग्दर्शनाची धुरा नितीन कुमार गुप्ता आणि उत्तम माहेश्वरी सांभाळणार आहेत.
या घोषणेसोबतच प्रसिद्ध फोटोग्राफर विरल भयानीने एक एआय जनरेटेड पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले,
ज्यामध्ये एक महिला सैनिक बंदूक हातात घेऊन उभी आहे. पोस्टरवर “भारत माता की जय – ऑपरेशन सिंदूर” असे लिहिले आहे.
मात्र या घोषणेनंतर सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला गेला.
सामाजिक प्रतिक्रिया आणि तणावाचा प्रश्न
देशात भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरण असताना अशा संवेदनशील विषयावर तातडीने
चित्रपटाची घोषणा करणे गैर असल्याचे अनेकांचे मत आहे. काही जणांनी याला “मेकर्सना केवळ अटेंशन पाहिजे” अशी टीका केली.
विरोधानंतर निर्मात्यांनी माफी मागितली असून, जनभावनांचा आदर करत स्क्रिप्ट
आणि वेळेबाबत फेरविचार केला जाईल, असे स्पष्ट केले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akola-shaharat-vadi-vyasah-viger-paus/