अकोट, प्रतिनिधी (राजकुमार वानखडे) – अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या
जाणाऱ्या मुंडगाव ग्रामपंचायतचे वीज कनेक्शन गेल्या चार दिवसांपासून खंडित असून,
यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व कामकाज ठप्प झाले असून,
नागरिकांना विविध प्रमाणपत्रांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.
५० हजारांची थकबाकी; कनेक्शन कट
ग्रामपंचायतच्या वीज बिलाची ५० ते ६० हजार रुपयांची थकबाकी असल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे.
मात्र, ग्रामपंचायतीकडे महावितरणच्या करपोटी ८५ हजार रुपये बाकी असल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायतीचे ग्राम सचिव गणेश जाधव यांनी सांगितले की, “विजेच्या थकबाकीबाबत
महावितरणकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
तरीही वीजपुरवठा खंडित करण्यात आला, ही अन्यायकारक बाब आहे.”
महावितरणचा दावा – “वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरल्याने कारवाई”
महावितरणचे उप अभियंता उद्देश शेंद्रे यांनी सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांपासून वीज बिल थकले आहे.
वेळोवेळी ग्रामपंचायतीला सूचना देण्यात आल्या होत्या,
मात्र त्यांनी बिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित करावा लागला.”
ग्रामस्थांमध्ये संताप; त्वरित वीज जोडणीची मागणी
ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप असून,
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष घालून वीज जोडणी करावी, अशी मागणी होत आहे.
अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.