प्रेम, शांती, अहिंसा आणि अपरिग्रहाचा संदेश देणाऱ्या महावीरांचा जयघोष
अकोला (प्रतिनिधी) –
जगातील प्रमुख धर्मसंस्थापकांमध्ये भगवान महावीर यांचे स्थान अत्यंत आदरणीय मानले जाते.
आज भगवान महावीर यांचा जन्मोत्सव देशभरात श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
या निमित्ताने अकोला शहरातील जैन समाजाच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.
जुन्या जैन मंदिरापासून ढोल-ताशांच्या गजरात प्रारंभ झालेल्या या शोभायात्रेमध्ये
भगवान महावीर यांची भव्य प्रतिमा मिरविण्यात आली.
महावीरांचे नामघोष करीत रॅली शहरातील मुख्य मार्गावरून विस्मयकारी वातावरणात पुढे सरकली.
रॅलीत लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत मोठ्या संख्येने जैन बांधवांनी सहभाग घेतला.
महावीरांचा संदेश आजही तितकाच प्रभावी
भगवान महावीर हे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर असून त्यांनी जगाला अहिंसा, अपरिग्रह, प्रेम आणि शांती यांचा अमूल्य संदेश दिला.
त्यांचा उपदेश आजच्या आधुनिक काळातही मानवतेसाठी मार्गदर्शक ठरतो.
त्यांच्या जयंतीनिमित्त रॅलीत सहभागी झालेल्या भाविकांनी “जियो और जीने दो”, “अहिंसा परमो धर्म:”
अशा घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय केला.
शिस्तबद्ध आणि सुसज्ज आयोजन
या शोभायात्रेच्या मार्गावर स्वच्छता, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते.
विविध सामाजिक व सांस्कृतिक मंडळांनी रॅलीला मार्गावर अभिवादन करून सहभाग नोंदवला.
रॅलीदरम्यान विविध ठिकाणी जलसेवा व अल्पोपहार यांचीही सोय करण्यात आली होती.
एकतेचे प्रतीक ठरलेले उत्सवाचे रूप
महावीर जयंती निमित्त साजऱ्या झालेल्या या भव्य रॅलीने केवळ धार्मिक उत्सवापुरती
मर्यादा न ठेवता सामाजिक एकतेचा आणि अहिंसेचा संदेशही शहरभर पोहोचवला.
शांततेच्या आणि प्रेमाच्या मार्गावर चालण्याचा निर्धार अनेकांनी व्यक्त केला.