22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला भारताने
‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे सडेतोड उत्तर दिले आहे. या सैनिकी कारवाईत भारताने पाकिस्तान
आणि पाक अधिकृत काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
या धाडसी कारवाईनंतर देशभरात, तसेच राज्यात आनंदाचे आणि देशभक्तीने भारलेल्या वातावरणाची लाट उसळली आहे.
अकोल्यातही ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात असून, मोहम्मद अली चौकात मुस्लिम बांधवांनी फटाके फोडत,
मिठाई वाटून आणि घोषणा देत ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद व्यक्त केला.
नमाज अदा केल्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले आणि भारतीय सेनेचे अभिनंदन केले.
यावेळी “भारतीय सेना जिंदाबाद”, “आमचा देश, आमचा अभिमान” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
उपस्थितांनी सांगितले की, “देशहितासाठी जी कारवाई झाली आहे, ती योग्य आणि आवश्यक होती. दहशतवादाचा अंत होणे गरजेचे आहे.”
या घटनेने अकोल्यातील सामाजिक सलोखा आणि राष्ट्रनिष्ठा याचे एक सकारात्मक उदाहरण समोर आले आहे.
देशभक्ती ही केवळ एका समाजापुरती मर्यादित नसून, ती सर्व भारतीयांची सामूहिक भावना आहे, हे या दृश्यातून स्पष्ट झाले.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolidat-shiva-naikoon-sainikana-salaam-ladu-watoon-jallosh/