Ajit Pawar : एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर होते. ते म्हणाले की अजित पवारांच्या पुण्यात भगवा झेंडा फडकावयचा आहे.
त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं. सध्या राज्यात महायुतीच सरकार आहे. भाजप,
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष मिळून सत्तेत आहेत.
Related News
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदमपूर येथील हवाई तळावर जाऊन
भारतीय जवानांना उद्देशून ठाम आणि प्रेरणादायी संदेश दिला. या कारवाईनंतर पंतप्रधानांनी थेट सीमेवर
क...
Continue reading
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणारे भूषण गवई यांच्याबाबत संपूर्ण देशात अभिमानाची लाट आहे.
अमरावतीच्या मातीतून आलेल्या गवई यांच्या मातोश्री कमलाताई ...
Continue reading
महाराष्ट्र बोर्डाच्या २०२५ च्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,
यंदाही विद्यार्थ्यांची यशाची टक्केवारी उंचावलेली दिसून येते. मात्र जे विद्यार्थी या परीक्षेत अपयशी ठर...
Continue reading
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा थेट परिणाम आता जनतेच्या खिशावर दिसून येतोय.
भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले असून, फरसबी, गवार, मटार यांसारख्या भाज्यांनी शंभरी पार केली आहे.
यामुळे रोजच्...
Continue reading
पाकिस्तानी कलाकारांनी भारताविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर, त्याला आता चोख प्रतिसाद दिला जात आहे.
फवाद खान आणि माहिरा खान यांच्यावरील कारवाईचा फटका आता प्रत्यक्ष त्यांच्या क...
Continue reading
किन्हीराजा | प्रतिनिधी
किन्हीराजा येथील शेतकरी आणि माजी सरपंच वैजनाथ आप्पा वसंत गोंडाळ यांच्या
शेतात घडलेल्या दुर्दैवी अपघातात ३ जनावरांचा विजेच्या शॉकने मृत्यू झाला आहे.
गोंडाळ...
Continue reading
रात्रभर मचानावर बसून निसर्गप्रेमींनी घेतली प्राण्यांची नोंद.
शेलुबाजार वार्ता :- श्याम अपूर्वा .१३
बौद्ध पौर्णिमेच्या लख्ख चंद्रप्रकाशात वाशीम-अकोला जिल्ह्याच्या सीमेलगत असल...
Continue reading
पुणे | १३ मे २०२५
सातत्याने आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकरी आणि नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
मान्सून अंदमानात दाखल झाला असून पुढील काही दिवसांत
महाराष्ट्रातही (६ जून र...
Continue reading
श्रीनगर | १३ मे २०२५
जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील शुकरू-केलर परिसरात आज पहाटेपासून सुरक्षा दल आणि
अतिरेक्यांमध्ये भीषण चकमक झाली. या कारवाईत सुरक्षा दलांनी तीन पाकिस्ता...
Continue reading
नवी दिल्ली | १३ मे २०२५
"ऑपरेशन सिंदूर"द्वारे पाकिस्तान आणि तिथे आश्रय घेतलेल्या दहशतवाद्यांना जोरदार चपराक दिल्यानंतर
आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअरबेसला भेट द...
Continue reading
नवी दिल्ली | १३ मे २०२५केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) इयत्ता बारावीचा निकाल आज अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला आहे.
यंदा 88.39% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हा निकाल ग...
Continue reading
mahahsscboard.in वर दुपारी 1 वाजता लिंक सक्रिय"
मुंबई | १३ मे २०२५
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये झालेल्या
इयत्ता दहावी...
Continue reading
“तीन तारखेला पुरवणी मागण्या मांडल्या जातील. हे बजेट अधिवेशन आहे.
कामकाज सल्लागार समितीने 10 तारखेला अर्थसंकल्प सादर करण्यास मान्यता दिली आहे.
केंद्राने जसा सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, तसच आमचं सरकार सुद्धा त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतेय.
बजेट ज्या दिवशी मांडणार त्या दिवशी चित्र स्पष्ट होईल” असं अजित पवार म्हणाले. एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर होते.
ते म्हणाले की अजित पवारांच्या पुण्यात भगवा झेंडा फडकावयचा आहे. त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं.
“तुम्ही लावालाव्या करायचं बंद करा. हे असले धंदे बंद करा. खऱ्या बातम्या द्यायला शिका.
एकदा पोलिसांचा रिपोर्ट येऊ द्या. मग काय घडलं ते समजेल. काही जण इतका उतावीळपणा दाखवतात की,
माहिती घेण्याआधी न्यूज देतात. इतका अतातयीपणा चांगला नाही.
सबुरीने घेतलं तर बरं होईल” असं अजित पवार म्हणाले.
‘एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेत आहेत’
“महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय. त्याचबरोबर प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे.
एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेत आहेत, ते महाराष्ट्रात गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात तसं सांगू शकतात.
देवेंद्र फडणवीस साहेब
गेले तर ते भाजपचा झेंडा रोवायचा आहे असं सांगणार.
मी गेलो तर, राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा आहे असं सांगिन” असं अजित पवार म्हणाले.
अजित पवारांकडून सबुरीचा सल्ला कोणाला?
“आम्ही एकजुटीने रहायचं असं ठरवलं आहे. आम्ही काही बोललो, तरी जनता-जनार्दनाच्या हाती सर्वकाही आहे.
कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात. पत्रकारांना सबुरीचा सल्ला देताना,
माझ्यासकट सगळ्यांना हा सबुरीचा सल्ला आहे” असं अजित पवार म्हणाले.
14 लाख विद्यार्थींची तपासणी
“आरोग्य मंत्री यांनी स्तुत्य उपक्रम राबविला त्यांचे कौतुक. परिवाराचे आरोग्य चांगले आहे का नाही हे पाहण्यासाठी
आरोग्य तपासणी महत्वाची. फुले, शाहू, आंबेडकर विचारांच्या महाराष्ट्रात जन्माला आलेलं मुलं सुदृढ असली पाहिजेत.
कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे यावर सुद्धा कशी लस देता येईल याचा विचार आम्ही करत आहोत. शालेय मुलांच्या पायाच्या
नखांपासून केसांपर्यंत सर्व आरोग्य तपासणी करणार आहोत. बाल स्वास्थ कार्यक्रम राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे.
महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यातील 14 लाख विद्यार्थींची तपासणी केली जाणार आहे” असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
Read more news here : https://ajinkyabharat.com/actress-kela-sasu-sasu-sasyancha-insult-birthday-wideo-pahun-natkari-bhadkale/