अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरात अनेक दिवसांपासून विनापरवाना सुरू असलेल्या वीट भट्ट्यांकडे महसूल विभागाने डोळेझाक केल्याचे चित्र समोर आले आहे. मात्र, हा प्रकरण प्रसार माध्यमांत येताच प्रशासन अचानक ॲक्शन मोडमध्ये आले आहे. दि. ९ मार्च २०२६ रोजी अकोट तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत, वीट भट्ट्यांची तपासणी व पंचनामा केला.
स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, महामार्गालगत सुरू असलेल्या या भट्ट्यांमुळे वाहनधारकांना व परिसरातील नागरिकांना गंभीर त्रास सहन करावा लागत होता. तपासणीत नोंदवले गेले की, अनेक दिवस बिनधास्तपणे हे व्यवसाय सुरू होते, तरीही प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नव्हते.
तपासणीनंतर तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण यांनी आदेश दिले की, संबंधित वीट भट्ट्यांचे पजावाधारक ३१ मार्च २०२६ पूर्वी शासनाकडे रॉयल्टी भरण्याचे आदेश पाळतील. जर निर्धारित मुदतीत रॉयल्टी भरली नाही, तर दंडात्मक कारवाई करून मालमत्तेवर बोजा लादण्यात येईल.
Related News
मुर्तिजापूर : इराण, इराक, कतर तसेच अमेरिकेसोबत वाढत चाललेल्या तणावामुळे आखाती देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर त्या देशा...
Continue reading
लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक आणि ‘मराठी बाणा’ कार्यक्रमाचे निर्माता अशोक हांडे यांना मुंबईतील माटुंगा परिसरातील त्यांच्या कार्यालयात पार्किंगवि...
Continue reading
अकोट येथील भाऊसाहेब पोटे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील NMMS परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे. 24 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार, शाळेचे 133 विद...
Continue reading
यवतमाळमधील रेमंड डेनीम कंपनीतील कामगारांच्या सुरू असलेल्या उपोषणासंदर्भात आज आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी महाराष्ट्र राज्याचे कामगार कल्या...
Continue reading
अकोट येथील टाकपुरा येथील मारुती संस्थानच्या सभागृहात रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ अकोट यांच्या संयुक्त प्रयत्नाने भ...
Continue reading
महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (SP) अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत रविवार, 22 फेब्रुवारी 2026 रोजी अचानक पुन्हा एकदा ...
Continue reading
अकोट (दि. ११ फेब्रुवारी २०२६): स्थानिक श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोट येथील अर्थशास्त्र विभागाच...
Continue reading
दरम्यान, महसूल विभागाचे अनेक दिवस बिनधास्तपणे दुर्लक्ष केल्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे. प्रसार माध्यमांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतरच प्रशासन जागे झाले, अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे. स्थानिक नागरिक आता फक्त पंचनामा न होता, विनापरवाना सुरू असलेल्या वीट भट्ट्यांवर कायमस्वरूपी कारवाई करण्याची मागणी करत आहेत, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या अतिक्रमणांवर निर्बंध घालता येतील.
read also : https://ajinkyabharat.com/arshdeep-singla-t20-world-cup-2026-necessary-reason-to-pay-penalty-after-final-match/