मुंबई | ता. १७ एप्रिल २०२५ —
भारतातील पहिल्या उच्चगती रेल्वे मार्गासाठी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
जपान सरकारकडून भारताला दोन शिंकान्सेन बुलेट ट्रेन संच—E5 आणि E3 सिरीज—मोफत देण्यात येणार आहेत.
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
हे दोन्ही संच २०२६ च्या सुरुवातीस भारतात दाखल होण्याची शक्यता आहे.
या बुलेट ट्रेन संचांमध्ये विशेष निरीक्षण उपकरणे बसवण्यात आली असून,
भारतातल्या उष्ण हवामान, धूळ व भूप्रदेशातील विविध
अडचणींमध्ये बुलेट ट्रेनची कामगिरी कशी राहते, याचे महत्त्वाचे डेटा संकलित करण्यात येणार आहे.
मुंबई-अहमदाबाद दरम्यान सुरु असलेल्या उच्चगती रेल्वे प्रकल्पाच्या चाचण्या आणि तपासणीसाठी हे ट्रेन संच वापरण्यात येणार आहेत.
ही पुढाकार भारत-जपान मैत्रीतील आणखी एक मजबूत पाऊल असून,
भारतीय अभियंत्यांना शिंकान्सेन तंत्रज्ञान समजून घेता यावे आणि देशांतर्गत
हाय-स्पीड रेल्वे तंत्रज्ञान विकसित करण्यास गती मिळावी, या उद्देशाने ही मदत करण्यात आली आहे.
ई१० सिरीज प्रवासी सेवेसाठी
सध्या मोफत देण्यात येणारे E5 आणि E3 सिरीजचे संच केवळ चाचणीसाठी वापरण्यात येणार असून,
प्रत्यक्ष प्रवासी वाहतुकीसाठी जपानच्या पुढील पिढीतील E10 सिरीज ट्रेनची निवड करण्यात आली आहे.
ही प्रवासी सेवा २०३० च्या सुरुवातीस सुरू होण्याची शक्यता आहे.
भारत-जपानमधील या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे देशातील हाय-स्पीड रेल्वे तंत्रज्ञानाला चालना मिळणार असून,
यामुळे भारतातील रेल्वे वाहतुकीत ऐतिहासिक बदल घडेल, असा विश्वास रेल्वे मंत्रालयाने व्यक्त केला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akol-ninth-central-government-congress/