नाशिक : शिवसेनेकडून अर्ज दाखल केल्याचा दावा करत जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख शांतीगिरी महाराज यांनी एकच खळबळ उडवून दिली.
महायुतीत उमेदवारीवरुन घोळ असताना महाराजांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांनी अर्जात पक्षाच्या पुढे शिवसेना असा उल्लेख केल्यानं महायुतीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली.
आपल्याकडे पक्षाचा एबी फॉर्म नसल्याचं सांगितलं. प्रभू रामचंद्र सगळं काही व्यवस्थित करतील, असा आशावाद त्यांनी अर्ज भरल्यानंतर व्यक्त केला.
Related News
दादरमध्ये रामरक्षा आंदोलन : मुसळधार पाऊस, रेड अलर्ट आणि प्रशासनाकडून अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन अशा परिस्थितीतही मुंबईतील दादर परिसर रविवारी भगवामय झाल्याचे चित...
Continue reading
TMC Crisis : ममता बॅनर्जींना 5 मोठे धक्के! प्रदेशाध्यक्ष चंद्रिमा भट्टाचार्यांचा धक्कादायक राजीनामा, तृणमूलमध्ये वाढले बंड
पश्चिम बंगालच्या राजक...
Continue reading
भारतातील पहिलं रेल्वे स्टेशन कोणतं? 3 वेळा बदललं नाव; इतिहास जाणून तुम्हीही व्हाल थक्क!
भारतातील पहिले रेल्वे स्टेशन आज ज्या नावाने ओळखले जाते,...
Continue reading
अंबरनाथ नगरपरिषदेच्या सभेत शिंदे शिवसेनेचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी 'थोडा भ्रष्टाचार झालाच पाहिजे' असे वादग्रस्त...
Continue reading
Parliament Monsoon Session २० जुलै ते १३ ऑगस्ट २०२६ दरम्यान होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पक्षफुटी, १३१वे घटनादुरुस्ती विधेय...
Continue reading
सुषमा अंधारे, बाबाजी काळे शिंदेंच्या शिवसेनेत येणार? सचिन अहिरांच्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चामहाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिवसेनेतील घडामोडी पुन्हा एकद...
Continue reading
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी पा...
Continue reading
मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडा...
Continue reading
पंजाब काँग्रेसमध्ये खळबळ! अमित शहांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण; काँग्रेस फुटणार की केवळ राजकीय योगायोग?
पंजाबच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील का...
Continue reading
PM मोदींचा भार कमी होणार? अमित शाह उपपंतप्रधानपदी विराजमान होणार? मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना वेग; 7 मोठे संकेत
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मं...
Continue reading
Health Update: 5 मोठे अपडेट्स! एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; प्रकृतीत सुधारणा, सायंकाळी डिस्चार्जची शक्यता
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना...
Continue reading
कल्याण-शीळ मार्गावरील भीषण ट्रॅफिक जॅमवरून राजकारण पेटलं, शिवसेना आमदार टार्गेटवर
Kalyan Shil Road Traffic Issue: कल्याण-शीळ मार्गावरील मेट्रो प्रकल्पा...
Continue reading
निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना ३ मेपर्यंत एबी फॉर्म सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उमेदवारी दाखल करत नाशिकमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या शांतीगिरी महाराजांच्या संपत्तीचा आकडा डोळे विस्फारुन टाकणारा आहे.
गेल्या १५ वर्षांत त्यांची संपत्ती तब्बल ३८ कोटी रुपयांनी वाढली आहे. २००९ मध्ये महाराजांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती.
तेव्हा त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात संपत्तीचं मूल्य केवळ ७१ लाख ३९ हजार १५४ रुपये होतं.
आताच्या घडीला महाराजांची संपत्ती तब्बल ३९ कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. म्हणजेच गेल्या १५ वर्षांमध्ये शांतीगिरी महाराजांची संपत्ती तब्बल ३८ कोटी रुपयांनी वाढली आहे.
वेरुळ गावात शांतीगिरी महाराजांचा मठ आहे. जनार्दन स्वामी यांचं निर्वाण झाल्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून शांतीगिरी महाराजांची नेमणूक करण्यात आली.
त्यांच्याकडे असलेल्या वाहनांचं मूल्य ६७ लाख ९१ हजार ४८६ रुपये इतकं आहे. त्यांच्यावर ७५ हजारांचं पीक कर्ज आहे.
शांतीगिरी महाराज यांच्या जय बाबाजी भक्त परिवाराचा प्रभाव नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या जिल्ह्यांवर आहे.
महाराजांची संपत्ती किती आणि कुठे?
मौजे वेरुळ खुलताबादमध्ये २ एकर १ गुंठा जमीन- बाजारमूल्य ४,१३,४७,८०० रुपये
मौजे वेरुळ खुलताबादमध्ये १ एकर २६ गुंठे जमीन- बाजारमूल्य ३,४९,८६,६०० रुपये
मौजे वेरुळ खुलताबादमध्ये १० एकर ४ गुंठे जमीन- बाजारमूल्य २१,४१,६०,४०० रुपये
लाखलगाव (नाशिक) ६ एकर ३० गुंठे जमीन- बाजारमूल्य ८७,४८,००० रुपये
शिवडी निफाड ८ एकर ७ गुंठे जमीन- बाजारमूल्य ६८,७४,८०० रुपये