वाडेगाव धान्य बाजारात दुर्गंधीयुक्त पाण्याचे डबके, शेतकऱ्यांचा संताप

वाडेगाव

बाळापूर : कृषी उत्पन्न बाजार समिती बाळापूर अंतर्गत वाडेगाव येथील उपबाजारातील धान्य बाजारात ठिकठिकाणी दुर्गंधीयुक्त पाण्याचे डबके साचल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळ्यामुळे बाजार परिसरात पाणी साचून डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती झाली असून धान्य विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या धान्याची आवक काहीशी मंदावली असली तरी वाडेगाव आणि परिसरातील अनेक शेतकरी नियमितपणे धान्य विक्रीसाठी बाजारात येत आहेत. मात्र बाजारातील अस्वच्छता, साचलेले पाणी आणि दुर्गंधी यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. डासांमुळे साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

या गंभीर समस्येकडे बाजार समितीच्या संचालक मंडळाने दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांकडून बाजार शुल्काची वसुली केली जाते, मात्र मूलभूत स्वच्छता आणि आरोग्यविषयक सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Related News

धान्य बाजारातील साचलेले पाणी तातडीने हटवून स्वच्छता मोहीम राबवावी, डास प्रतिबंधक फवारणी करावी आणि बाजार परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी संबंधित प्रशासनाकडे केली आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/sensex-top-6-companies-earn-rs-1-lakh-crore-strong-in-5-days-airtel-tops-reliance-and-lt-big-hit/

Related News