अकोला जिल्ह्यात अवघ्या काही तासांच्या अंतराने घडलेल्या दोन हत्यांच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे. अकोला शहरातील तरुणाच्या हत्येची घटना ताजी असतानाच पातूर तालुक्यातील आलेगाव येथे १७ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मृत युवकाचे नाव यश गिऱ्हे (वय १७) असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून यशची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर घटनास्थळावरून फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Related News
Nagpur Rain: नागपुरात तुफान पाऊस! रस्ते जलमय, सोमलवार शाळेचं मैदान पाण्याखाली; नागरिकांची तारांबळ
दिल्लीतील आंदोलनात परदेशी शक्तींचा हस्तक्षेप? पाकिस्तान-मलेशियातून 500 हून अधिक पोस्ट; सायबर सेलचा मोठा खुलासा
CJP Protest : फडणवीसांचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरील आंदोलनाचे गुन्हे होणार रद्द
मोठी बातमी! E20 पेट्रोलविरोधात दिल्लीत नवं आंदोलन; नितीन गडकरींच्या राजीनाम्याची मागणी, 4 ऑगस्टला संसदेला घेराव
मोठी बातमी! ‘शेतकऱ्यांना त्रास झाला तरी सहन करू, पण उद्योजकांना नको’; गुलाबराव पाटलांच्या विधानाने खळबळ
Cabinet Decisions : मोठी बातमी! महाराष्ट्र सरकारचे 7 मोठे निर्णय; ग्रामपंचायतीपासून न्यायालयांपर्यंत मोठ्या घोषणा
Bank of Baroda च्या ग्राहकांनो सावधान! 1 टीबी डेटा लीक झाल्याचा दावा; हॅकर्सकडे तुमची माहिती?
Sonam Wangchuk : जिंकलो म्हणून नाचले, पण सीजेपीच्या सेलिब्रेशनवर सोनम वांगचुक स्पष्टच बोलले
Post Officeची धमाकेदार योजना! दररोज 300 रुपये गुंतवा अन् 10 वर्षांनी मिळवा 15 लाखांहून अधिक, जाणून घ्या कॅल्क्युलेशन
मोठी बातमी! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? शरद पवारांनी 1 वाक्यात केला मोठा खुलासा
Rule Change: फक्त 3 दिवस बाकी! 1 ऑगस्टपासून बदलणार हे 5 मोठे नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
मोठी बातमी! जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश; महाराष्ट्रासह 8 राज्यांना नोटीस
दरम्यान, अकोला शहरातील भररस्त्यात झालेल्या एका तरुणाच्या हत्येनंतर काही तासांतच आलेगावमध्ये घडलेल्या या दुसऱ्या खूनामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. सलग घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून पोलिसांसमोर कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या दोन्ही घटनांचा सखोल तपास सुरू असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
read also : https://ajinkyabharat.com/a-sudden-unannounced/
