अकोला जिल्ह्यात अवघ्या काही तासांच्या अंतराने घडलेल्या दोन हत्यांच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे. अकोला शहरातील तरुणाच्या हत्येची घटना ताजी असतानाच पातूर तालुक्यातील आलेगाव येथे १७ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मृत युवकाचे नाव यश गिऱ्हे (वय १७) असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून यशची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर घटनास्थळावरून फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Related News
Godavari River Tragedy: 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू! काकू पुतण्यांना वाचवायला गेल्या, पण गोदावरीने तिघांनाही गिळलं; वाळू उपशामुळे पडलेल्या खड्ड्यांचा घात
Ladki Bahin Yojana : धक्कादायक! 33 हजार महिला कायमच्या अपात्र, लाडकी बहीण योजनेत मोठी कारवाई; राज्यभरात खळबळ
अकोल्यात भरचौकात तरुणाची निर्घृण हत्या; जुन्या वादातून धारदार शस्त्राने हल्ला
370 रुपयांच्या बिर्याणी प्रकरणात मोठा खुलासा! हिमांशू जांगराची धक्कादायक कबुली, प्रणित मोरेनेच दिलं प्रोत्साहन
48 मिनिटांत मुंबई ते पुणे! 7 हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पांमुळे भारतात प्रवासाची नवी क्रांती
“धक्कादायक 2-इन-1 गोंधळ! पुण्यात नाटक-शोकसभा एकाच वेळी, बालगंधर्व रंगमंदिरात मोठा वाद”
मुंढेंचा धडाकेबाज निर्णय! औषध खरेदीबाबत 5 कडक नियम; रुग्णांसाठी मोठा दिलासा
“भीषण आणि धक्कादायक टिटवाळा हल्ला: 12 गुंडांनी चाळीत घातला हैदोस – संपूर्ण प्रकरण 1 रिपोर्टमध्ये”
“भयावह वातावरण! तुकाराम मुंढेंच्या नावाने 10 पेक्षा अधिक दुकाने बंद, बीडमध्ये खळबळ”
कौटुंबिक वादातून आईने स्वतःसह 4 मुलांना विष पाजले; रायगडमध्ये काळीज पिळवटणारी घटना!
धक्कादायक मोठी कारवाई: 1 सराईत ‘फटका गँग’ मोहरा अटक, रेल्वे प्रवाशांना दिलासा
पालघरमध्ये तरुणीवर कोयत्याने भयानक हल्ला; 2 MPSC क्लर्कचा धक्कादायक प्रेमप्रकरण वाद !
दरम्यान, अकोला शहरातील भररस्त्यात झालेल्या एका तरुणाच्या हत्येनंतर काही तासांतच आलेगावमध्ये घडलेल्या या दुसऱ्या खूनामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. सलग घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून पोलिसांसमोर कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या दोन्ही घटनांचा सखोल तपास सुरू असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
read also : https://ajinkyabharat.com/a-sudden-unannounced/
