अकोला जिल्ह्यात अवघ्या काही तासांच्या अंतराने घडलेल्या दोन हत्यांच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे. अकोला शहरातील तरुणाच्या हत्येची घटना ताजी असतानाच पातूर तालुक्यातील आलेगाव येथे १७ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मृत युवकाचे नाव यश गिऱ्हे (वय १७) असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून यशची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर घटनास्थळावरून फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Related News
‘अमृताताई हिंदू असतील तर बाहेर येतील’; हळदी-कुंकवावरून मनोज जरांगे पाटील यांचे मोठे वक्तव्य
15 सप्टेंबरला मुंबईकडे कूच; जरांगे पाटलांनी जाहीर केला आंदोलनाचा A to Z प्लॅन
MPSC विद्यार्थ्यांसाठी लढणारे रोहित पवार म्हणाले, “मी देखील काठावर पास झालो आहे”; लातूरमध्ये मोठं वक्तव्य
UPI वापरणाऱ्या छोट्या दुकानदारांसाठी मोठी खुशखबर! आता मिळणार कर्ज, SBI ची नवी योजना
14 सप्टेंबरला हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी; आधी कोणती पूजा करायची? जाणून घ्या
मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर सरकारची पहिली प्रतिक्रिया; बावनकुळेंनी स्पष्ट केली भूमिका!
मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनापूर्वी मोठी खलबतं; फडणवीस-बावनकुळे यांची महत्त्वाची बैठक!
LPG सिलेंडरसाठी पुन्हा रांगा लागणार? होर्मुज स्ट्रेट संकटामुळे भारतावर मोठं संकट!
शेतकरी संकटात, जरांगे उपोषणावर; राऊतांचा सरकारला सवाल – ‘महाराष्ट्राकडे पाहायला वेळ आहे का?’
गणेशोत्सवातील 10 दिवसांच्या दारूबंदीवर कोर्ट संतापले; पुणे प्रशासनाला फटकारले!
EV मार्केटमध्ये टाटाचा धमाका! ऑगस्टमध्ये 16 हजारांहून अधिक इलेक्ट्रिक कारची विक्री
Manoj Jarange Patil चा ‘प्लान बी’ ठरला! मुंबईत काही घडलं तर राज्यभर आंदोलनाचा इशारा
दरम्यान, अकोला शहरातील भररस्त्यात झालेल्या एका तरुणाच्या हत्येनंतर काही तासांतच आलेगावमध्ये घडलेल्या या दुसऱ्या खूनामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. सलग घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून पोलिसांसमोर कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या दोन्ही घटनांचा सखोल तपास सुरू असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
read also : https://ajinkyabharat.com/a-sudden-unannounced/
