चार ते पाच घरे फोडून रोकड आणि दागिन्यांची चोरी
पातुर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
पातुर (प्रतिनिधी): पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम देऊळगाव येथे 25 मार्चच्या
Related News
मनभा परिसरात संततधार पावसामुळे दुबार पेरणीचे संकट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
हिंदी जीआरवर सरकारची माघार; ठाकरेबंधूंच्या एकतेमुळे मराठी ताकद उभी – संजय राऊतांचा दावा
हिंदी सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक; “जाधव येऊ देत की कोणीतरी… आम्ही खपवून घेणार नाही!”
अकोला जिल्ह्यात व्यवसाय शिक्षण अधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत
शिक्षण राज्यमंत्री यांच्या हस्ते श्री शिवाजी विद्यालयाच्या गौरी व वैभवीचा सत्कार
बोर्डी ग्राम पंचायत थकित गौण खनिज दंड वसुली प्रकरण गुलदस्त्यात
कुंडामधून गरम पाण्याचा झरा : अद्भुत घटना
पिंजर पोलिसाकडून अमली पदार्थ मिशन उडान दिनानिमित्त विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन
जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त ‘मिशन उडान’ अंतर्गत अकोला पोलिसांकडून भव्य जनजागृती उपक्रम
राजेश्वर मंदिराच्या विकासावरून आरोप-प्रत्यारोप; भाजपाची आमदार पठाण यांच्यावर टीका
दानापुर येथे राजर्षी शाहु महाराज जयंती उत्सव संपन्न
रशियात खासगी दौऱ्यावर गेलेले शशि थरूर; मॉस्कोमध्ये रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार ते पाच घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास
केल्याची घटना घडली आहे. या चोरीमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
चोरीचा सविस्तर घटनाक्रम:
चोरट्यांनी पत्रकार गोपाल बदरके आणि त्यांचे भाऊ संदीप बदरके यांच्या घरात प्रवेश
करून 1.58 लाख रुपये रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 4.33 लाखांचा ऐवज चोरून नेला.
बदरके यांनी शेत विहीर बांधकामासाठी बँकेतून मोठी रक्कम काढली होती, जी कपाटात ठेवली होती.
त्यांच्या घरातील दरवाज्याला बाहेरून कडी लावून चोरट्यांनी आत प्रवेश मिळवला.
तसेच, राजेंद्र बळकार, मनोहर कराळे, कैलास राठोड आणि शंकर गोळे यांच्या घरांवरही
चोरट्यांनी डल्ला मारला.
काही घरांतून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि दागिने लंपास करण्यात आले, तर काही ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला.
पातुर पोलिसांवर नागरिकांचा रोष:
या घटनेनंतर गावकऱ्यांनी पातुर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
👉 गावातील सुरक्षितता धोक्यात आली असून पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
👉 पातुर पोलीस स्टेशनमध्ये सुमारे 50-60 कर्मचारी असले तरी
रात्री गस्त कमी असल्याने चोरटे फायदा घेत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
गुन्हा दाखल:
या प्रकरणी गोपाल बदरके यांनी पातुर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली असून अज्ञात
चोरट्यांविरुद्ध IPC कलम 331, 4, 305 BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावकऱ्यांनी पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.