मेलबर्नमध्ये मार्च महिन्यात पार पडलेल्या नेहा कक्करच्या वादग्रस्त
कॉन्सर्ट प्रकरणावरून अजूनही नवा वाद निर्माण होत आहे.
सिडनी आणि मेलबर्नमध्ये सलग दोन दिवसांचे कार्यक्रम असतानाही, मेलबर्न शोदरम्यान
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
कमी गर्दी पाहून गायिका नेहा कक्कर व्यासपीठावर रडली आणि आयोजकांवर गंभीर आरोप केले.
मात्र, आयोजकांनी केलेल्या नवे खुलासे पाहता, हा प्रकार एकतर्फी नव्हता,
तर त्यामागे नेहाचीही जबाबदारी ठसठशीत आहे, असं चित्र आता स्पष्ट होत आहे.
आयोजक पेस डी आणि विक्रम सिंग रंधावा यांनी प्रसिद्ध माध्यम प्रतिनिधी
सिद्धार्थ कण्णनला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं की, नेहाने शो सुरू करण्याआधी
अट ठेवली होती की “जर प्रेक्षकांची संख्या समाधानकारक नसेल, तर ती परफॉर्म करणार नाही.
” मेलबर्नमध्ये फक्त 700 चाहत्यांची उपस्थिती असल्यामुळे नेहाने व्यासपीठावर तीन तास वाट पाहूनही गाणं गायलं नाही.
यामुळे तिकीट विकत घेतलेल्या चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.
नेहाने यावर आरोप केला होता की आयोजकांनी ना हॉटेलची, ना जेवणाची,
ना ट्रान्सपोर्टची व्यवस्था केली होती. पण आयोजकांनी याचा स्पष्ट प्रतिवाद करत सर्व पुरावे सादर केले आहेत.
त्यांनी नेहासाठी हॉटेल, कार आणि प्रवासाची पूर्वतयारी पूर्ण केली होती, असा दावा केला आहे.
या सगळ्या प्रकरणातून आयोजकांचे तब्बल 500,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्सचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावर सध्या नेहाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र,
सोशल मीडियावर तिच्या समर्थकांनी आणि विरोधकांनी जोरदार चर्चा सुरू केली आहे.
नेहा कक्करने तिच्या इंस्टाग्रामवरून केवळ एक भावनिक पोस्ट शेअर करत
“काही लोक फक्त तुमचं यश पाहू शकत नाहीत,
” असं सूचक वक्तव्य केलं आहे. हे वक्तव्य आयोजकांवर अप्रत्यक्ष टोमणा आहे का,
याचीही चर्चा रंगू लागली आहे.
आता हे प्रकरण नेमकं कुठे थांबतं, आणि नेहा यावर थेट उत्तर देते का,
हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Read more here