मुंबई | प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या अग्रस्थानी असलेले नेते मनोज जरंगे पाटील यांनी आज मंत्रीपदाची शपथ
घेतलेल्या छगन भुजबळांवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
“अजित पवार हे प्रचंड मोठी चूक करत आहेत. ते जातीयवादी लोकांना पोसण्याचे काम करत आहेत.
याचे परिणाम त्यांना लवकरच भोगावे लागतील,” असा थेट इशारा जरंगे पाटलांनी दिला आहे.
“भुजबळांना चॉकलेट दिलंय!”
भुजबळांच्या मंत्रिपदावर प्रतिक्रिया देताना जरांगेंनी टोला लगावला :
“छगन भुजबळ मंत्री झाला की नाही याचा आम्हाला काही फरक पडत नाही. ही त्यांची पक्षांतर्गत गोष्ट आहे.
मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच भुजबळांना तात्पुरता आनंद दिला गेला आहे.
त्यांना चॉकलेट दिलंय, पण या आनंदावर लवकरच विरजण पडेल.”
“तात्पुरतं नादी लावलंय”
जरांगे पुढे म्हणाले,
“हे सरकार, हे नेते तात्पुरते उपाय करून प्रश्न नादी लावत आहेत. पण आम्ही थांबणार नाही.
आमच्या प्रश्नांना फक्त मंत्रीमंडळ नाही, तर न्याय हवा आहे.“
भुजबळांच्या विरोधात वारंवार आक्रमक
छगन भुजबळ हे मराठा आरक्षणाला खुला विरोध करणारे असल्याने मनोज
जरंगे पाटील हे त्यांच्या नेहमीच विरोधात आक्रमक राहिले आहेत.
आज पुन्हा एकदा मंत्रिपदाच्या निमित्ताने राजकीय तापमान वाढले असून,
मराठा आंदोलकांच्या भूमिका आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
जरंगे पाटलांच्या या प्रतिक्रियेनंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध
ओबीसी वादाचा सूर चढताना दिसतो आहे.
यामुळे आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारसमोर नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/state/