मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्रात आजचा दिवस घातक ठरला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अपघातांच्या मालिकेत एकूण
आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. लातूर, पुणे, कल्याण,
Related News
हुबेहूब रुपाली चाकणकरच… दीपाली सय्यदचा जबरदस्त लूक सोशल मीडियावर व्हायरल ; 5 फोटोत पाहा!
AI चा धक्कादायक गैरवापर! लग्नाला नकार दिल्यानंतर तरुणीचा छळ; 500 कॅब, बनावट हनीमून फोटो आणि डोहाळेजेवणाच्या आमंत्रणाने उडाली खळबळ
राम मंदिरातील 7 कोटींच्या कथित दानचोरीची धक्कादायक Inside Story: CCTV झाकून, वॉशरूममध्ये पैसे लपवून 70 वेळा चोरीचा थरार!
7.5 रिश्टरच्या भूकंपानंतर व्हायरल झालेला वडिलांचा फोटो खरा की खोटा? जाणून घ्या 5 मोठी सत्ये
भारताचा नेपाळला 2रा मोठा झटका! 3 लाख किलो चहा सीमेवर अडकला; बालेन शाह सरकारसमोर नवे संकट
मुंबई लोकलमध्ये रक्तरंजित हत्याकांड! 400 CCTV फुटेजमधून आरोपीपर्यंत पोहोचले पोलीस
मुंबई सोडून बेंगळुरूत करिअर! मराठी तरुणाने सांगितले 7 धक्कादायक अनुभव; पैसा मिळाला पण एकटेपणाची भीतीही वाढली
राम मंदिरातील दान चोरी प्रकरणात मोठी घडामोड; 2 वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
राम मंदिर देणगी घोटाळा: 8 जणांवर गंभीर गुन्हे दाखल; SIT अहवालानंतर मोठा धक्कादायक खुलासा
राज ठाकरेंचा जैन शिष्टमंडळाला स्पष्ट इशारा ‘कार्पेट टाका, पांढऱ्या पट्ट्या कशाला?’ ; 5 मोठे मुद्दे
10 हजारांची लाच घेताना मुद्रांक जिल्हाधिकारी रंगेहात; ACB ची धडाकेबाज कारवाई, किरण चौधरी अटकेत
अकोल्यात गजानन महाराज पालखीसोबत रस्ता सुरक्षा जनजागृती; 5 नियमांनी हजारो भाविकांना दिला ‘सुरक्षित प्रवासाचा’ शक्तिशाली संदेश
विक्रोळी आणि जळगाव येथे हे अपघात झाले. कुठे डंपर नदीत कोसळला,
तर कुठे दुचाकींची समोरासमोर धडक झाली. लातूर जिल्ह्यातील
अपघातांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
लातूर: दोन वेगवेगळ्या अपघातांत सहा जण ठार
घरणी (चाकूर तालुका) येथे दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक होऊन आई, मुलगा आणि जावई अशा एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू.
बार्शी रोडवरील उड्डाणपुलावर ट्रॅक्टर-रिक्षा अपघातात आणखी तिघांचा मृत्यू.
गेल्या तीन दिवसांत लातूर जिल्ह्यात नऊ जणांचा मृत्यू.
पुणे: शाळेत घुसला टेम्पो
सासवड-जेजुरी पालखी मार्गावर खळद येथे आयशर टेम्पो थेट जिल्हा परिषद शाळेच्या आरसीसी वर्गात घुसला.
मोठ्या नुकसानीसह कोणतीही जीवितहानी टळली, चालक जखमी.
नाशिक: सप्तश्रृंगी घाटात दरड कोसळली
पुण्याहून आलेल्या भाविकांच्या कारवर दगडगोट्यांचा मारा.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
कल्याण: डंपर नदीत कोसळला
गांधारी ब्रिजवर डंपरने रिक्षाला धडक दिल्यानंतर ब्रिजचे कठडे तोडून थेट नदीत कोसळला.
महिलेचा मृत्यू, एक जण गंभीर, दोन जण बेपत्ता.
रेस्क्यू ऑपरेशन सुरू, अग्निशामक दल घटनास्थळी.
विक्रोळी: दोन वाहने पलटी
नारायण बोधे पुलावर टेम्पो आणि टाटा सफारीची धडक.
दोन्ही वाहने रस्त्यावर उलटली, दोन्ही चालक किरकोळ जखमी.
वाहतुकीची कोंडी, पोलिस व आपत्ती व्यवस्थापन पथकांनी नियंत्रण मिळवलं.
जळगाव: रिक्षा चालकाचा मृत्यू
अमळनेर (मंगरूळ MIDC जवळ) चारचाकी वाहनाची रिक्षाला जोरदार धडक.
रिक्षाचालक भटू पाटील यांचा मृत्यू, रिक्षा चक्काचूर.
राज्यभरातील या अपघातांच्या घटनांमुळे वाहतूक सुरक्षा आणि रस्त्यांची स्थिती यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
संबंधित विभागांनी यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

