हिंदी सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक; “जाधव येऊ देत की कोणीतरी… आम्ही खपवून घेणार नाही!”

हिंदी सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक; "जाधव येऊ देत की कोणीतरी... आम्ही खपवून घेणार नाही!"

मुंबई | २७ जून २०२५ – महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे

यांनी कडाडून निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “पहिली ते पाचवी हिंदी चालणार नाही,

जाधव येऊ देत की अजून कोणीही… आम्ही खपवून घेणार नाही.”

Related News

फडणवीस सरकारने हिंदी सक्तीबाबतचा जीआर रद्द केला असला तरी

डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीबाबत चिंता व्यक्त करत,

राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या अस्मितेचा मुद्दा अधोरेखित केला. “मराठी माणसांनी या निर्णयाला विरोध केलाय,

जाधवांनी ही भावना समजून घ्यावी,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

राज ठाकरे यांनी विधीमंडळातील आमदारांना देखील उद्देशून म्हटले की,

मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण न करता शिक्षणातील मूळ प्रश्नांवर बोला – शिक्षकांची कमतरता,

पगाराचा अभाव आणि शाळांची अवस्था यावर लक्ष द्या.”

मराठी अस्मिता जपण्यासाठी मनसेने दिलेला आवाज जनतेच्या पाठिंब्यामुळे यशस्वी ठरल्याने मनसेतर्फे जल्लोषही करण्यात आला.

Read Also : https://ajinkyabharat.com/akola-district-business-teaching-authority-jaloshat-welcome/

Related News