अकोला :
विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने सरकारने अद्याप पूर्ण न केल्याचा आरोप करत शिवसेना (ठाकरे गट)
ने राज्य सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.
Related News
मनभा परिसरात संततधार पावसामुळे दुबार पेरणीचे संकट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
हिंदी जीआरवर सरकारची माघार; ठाकरेबंधूंच्या एकतेमुळे मराठी ताकद उभी – संजय राऊतांचा दावा
हिंदी सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक; “जाधव येऊ देत की कोणीतरी… आम्ही खपवून घेणार नाही!”
अकोला जिल्ह्यात व्यवसाय शिक्षण अधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत
शिक्षण राज्यमंत्री यांच्या हस्ते श्री शिवाजी विद्यालयाच्या गौरी व वैभवीचा सत्कार
बोर्डी ग्राम पंचायत थकित गौण खनिज दंड वसुली प्रकरण गुलदस्त्यात
कुंडामधून गरम पाण्याचा झरा : अद्भुत घटना
पिंजर पोलिसाकडून अमली पदार्थ मिशन उडान दिनानिमित्त विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन
जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त ‘मिशन उडान’ अंतर्गत अकोला पोलिसांकडून भव्य जनजागृती उपक्रम
राजेश्वर मंदिराच्या विकासावरून आरोप-प्रत्यारोप; भाजपाची आमदार पठाण यांच्यावर टीका
दानापुर येथे राजर्षी शाहु महाराज जयंती उत्सव संपन्न
रशियात खासगी दौऱ्यावर गेलेले शशि थरूर; मॉस्कोमध्ये रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
२ मे रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात
येणार असल्याची माहिती आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्यांनी सांगितले की, “राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते,
मात्र ती अद्याप प्रत्यक्षात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.”
याचबरोबर आमदार देशमुख यांनी सत्ता पक्षाला इशारा देत सांगितले की,
“जर २ मे पर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर हाच मोर्चा मुंबईकडे वळवण्यात येईल.”
यावेळी त्यांनी जाहीर केले की, “१ मे पर्यंत विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील सुमारे
पाच लाख शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे, जेणेकरून त्यांच्या अडचणी आणि मागण्या थेट समजून घेता येतील.”
शिवसेना ठाकरे गटाच्या या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.