धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एन्ट्री होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
मात्र याच मुद्यावरून आता अंजली दमानिया यांनी तोफ डागली आहे.
विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर अडीच महिन्यांतच महायुतीच्या एका नेत्याला राजीनामा द्यावा लागला.
Related News
CJP आता मोठं पाऊल उचलणार? भाजपच नव्हे तर काँग्रेससह विरोधकांचंही टेन्शन वाढणार; पुढचा निर्णय काय?
CJP News : नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशाच्या र...
Continue reading
नितीन गडकरी यांच्या अडचणीत वाढ? NEET नंतर आता E20 पेट्रोलचा मुद्दा चिघळणार; 4 ऑगस्टला थेट संसदेवर मोर्चा
E20 Petrol Protest : देशभरात E20 प...
Continue reading
मोठी बातमी! काँग्रेसला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्यांचा निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास, म्हणाले- ‘आता निवडणूक लढणार नाही’
Siddaramaiah News
Continue reading
145 किमी वेगाच्या चक्रीवादळाचा चीनला तडाखा; लाखो लोक संकटात, हाय अलर्ट जारी
Typhoon Noul : चीनच्या दक्षिण भागात नोल चक्रीवादळाने मोठा कहर केला आह...
Continue reading
कापलेली फळे लगेच काळी पडतात? फळे ताजी ठेवण्यासाठी ‘हे’ 5 घरगुती उपाय नक्की करून पाहा
फळे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. डॉक्टर आणि आहारतज्ज्ञदे...
Continue reading
मोदींच्या निवासस्थानी घातपाताचा प्रयत्न? एकनाथ शिंदेंच्या आरोपांनी खळबळ; राहुल गांधींवर गंभीर निशाणा
केंद्रीय शिक्षणमंत्री...
Continue reading
Petrol Diesel Rate: कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ; पेट्रोल-डिझेल महागणार? जाणून घ्या आजचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प...
Continue reading
मोठी बातमी! ‘तर हे घडलंच नसतं’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरून छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर, केली मोठी मागणी
केंद...
Continue reading
EPFO: नोकरी संपली तरी कमाईचे मीटर सुरूच? जाणून घ्या PF खात्यावर व्याज मिळण्याचा नेमका नियम
EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPF हा नोकरी करणाऱ...
Continue reading
चविष्ट आणि पौष्टिक आहारासाठी प्रथिनेयुक्त पनीरपासून बनवा ‘या’ 5 सोप्या रेसिपी; आरोग्यासाठीही फायदेशीर
चविष्ट आणि पौष्टिक आहारासाठी पनीरपासू...
Continue reading
ठाकरे बंधूंची ‘लंच डिप्लोमसी’; उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर, दोन तास चर्चा… राज्याच्या राजकारणात काय घडतंय?
केंद्रीय शिक्षणमंत्...
Continue reading
IND vs PAK : टीम इंडियाने पुन्हा पाकिस्तानला दिला धक्का; फायनलमध्ये 3-1 ने पराभव करत आशियाई चॅम्पियनशिपवर नाव कोरलं
भारत आणि पाकिस्तान यां...
Continue reading
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते,
मंत्री धनंजय मुंडे यांना काल राजीनामा द्यावा लागला. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड आहे.
तो धनंजय देशमुख यांचा निकटवर्तीय असल्यानेच मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे.
धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एन्ट्री होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
मात्र याच मुद्यावरून आता अंजली दमानिया यांनी तोफ डागली आहे. एक घाण गेली, दुसरी घाण येते हे दुर्दैवी आहे, अशा शब्दांत दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एन्ट्री होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यामध्ये यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.
डिसेंबर महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार
झाला, त्यावेळी छगन भुजबळ यांचा समावेश झाला नव्हता.
त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्याच वेळी छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा रंगली होती.
मात्र आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याने त्यांच्या जागी भुजबळ यांना मंत्रीमंडळात स्थान मिळू शकतं.
याच मुद्यावरून अंजली दमानियांनी रोखठोक भूमिका मांडली.
काय म्हणाल्या अंजली दमानिया ?
एक घाण गेली, दुसरी घाण येते हे दुर्दैवी आहे. ज्यांनी महाराष्ट्र सदनचा घोटाळा केला त्यांना मंत्रीपद कसं देऊ शकतात
असा सवाल अंजली दमानियांनी उपस्थित केला. एवढेच नव्हे तर, जर छगन भुजबळांना मंत्रीपद दिलं तर कोर्टात
जाऊन त्यांची बेल रद्द करण्याची मागणी करणार असल्याचेही दमानियांनी सांगितलं.
त्यामुळे छगन भुजबळांना मंत्रीपद मिळण्याच्या वाटेत मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यताही आहे.
गोरेंसारख्या व्यक्तीला मंत्रीमंडळातून काढून टाकलं पाहिजे
जयकुमार गोरेंसारख्या व्यक्तीला मंत्रीमंडळातून काढून टाकलं पाहिजे असं अंजली दमानिया म्हणाल्या.
पीडित महिलेसोबत आपण स्वतः राज्यपालांकडे जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.
विकृत व्यक्तींना मंत्रीमंडळात स्थान देऊ नका असी भूमिकाही दमानियांनी घेतली आहे.
मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात अंजली दमानिया अतिशय आक्रमर झाल्याचं पहायला मिळत आहे.
असा मंत्री जर मंत्रिमंडळात बसत असेल तर त्याला तिथून दूर करणे हे सरकारचं कर्तव्य आहे आणि अशा लोकांना
मंत्रिपदाची देण्याची काय गरज? चांगली लोकं सरकारला मिळत नाहीत का?
म्हणजे चांगली लोकं महाराष्ट्रात नाहीत का? का असे शोधून शोधून एक एक नग त्या मंत्रिमंडळात भरलेत मला तोच प्रश्न पडतोय असा सवालही अंजली दमानिया यांनी केला.
Read more here:
https://ajinkyabharat.com/dhananjay-munde-yancha-rajinamyacha-developed-chief-minister/