धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एन्ट्री होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
मात्र याच मुद्यावरून आता अंजली दमानिया यांनी तोफ डागली आहे.
विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर अडीच महिन्यांतच महायुतीच्या एका नेत्याला राजीनामा द्यावा लागला.
Related News
Bigg Boss 19 Grand Finale : बिग बॉस 19 चा भव्य ग्रँड फिनाले आज! कोण होणार विनर? कुठे आणि किती वाजता पाहाल शो?
Bigg Boss 19 Grand Finale : देशातील...
Continue reading
‘कुबूल है’ ते ‘सात फेरे’पर्यंत! बिग बॉस फेम सारा खानचा कृष्ण पाठकसोबत दोन्ही परंपरांत विवाहसोहळा
टेलिव्हिजन आणि रिअॅलिटी शो बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या परिचयाला आलेली लोकप्रिय अभिन...
Continue reading
माधुरी दीक्षित आणि डॉ. शिरीराम नने : अमेरिकेतील शांत जीवनानंतर भारतात परतण्यामागील कथा
बॉलिवूडची ‘नृत्याची राणी’ माधुरी दीक्षित हे 1990 च्या दश...
Continue reading
लहान मुलांना सर्दी-खोकला झाल्यास वाफ देणे योग्य की अयोग्य? डॉक्टर हिमांशू भदानी यांचा सल्ला
हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला की लहान मुलांमध्ये सर्दी-खोकला
Continue reading
सावधान! प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे होऊ शकते गंभीर आजाराचे कारण
आजकाल आपण सर्वच प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करतो, विशेषतः पाणी, रस, सॉफ्ट ड्र...
Continue reading
जेष्ठ पत्रकार स्व. सुधीर पाठक यांचे लिखाण आजही प्रेरणादायी – अकोट तालुक्यात स्मृतिदिन कार्यक्रम
अकोट: जेष्ठ पत्रकार स्व. सुधीर पाठक
Continue reading
जागतिक स्तरावर चमकलेले 4 भारतीय पदार्थ : अमृतसरी कुलचा, बटर चिकन, ह्यदराबादी बिर्याणी आणि शाही पनीर ‘टेस्ट अॅटलस’च्या टॉप १०० पदार्थांच्या यादीत स्थान मिळवले
भारतीय खाद्यसंस्कृती ...
Continue reading
चाणक्य नीती: असे लोक जर तुमच्या घरात असतील, तर सावधान! तुमच्या जीवाला धोका असू शकतो
चाणक्य नीती: आयुष्यात प्रत्येकाला सुख, समृद्धी आणि सुरक्षिततेची इच्छा असते, पण कधी कधी आपल्या घ...
Continue reading
मोत्याची अंगठी घालण्याचे फायदे आणि योग्य पद्धत – ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने मार्गदर्शन
आजकाल फॅशन आणि सौंदर्याच्या दृष्टीने अंगठी, हार किंवा इतर दागिन...
Continue reading
महिलां नी रोज किती प्रोटीन घ्यावे? निरोगी राहण्यासाठी जाणून घ्या
सध्याच्या काळात महिलां चे आरोग्य अधिक महत्त्वाचे झाले आहे. कामकाज, घरकाम, व्यायाम आणि ...
Continue reading
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते,
मंत्री धनंजय मुंडे यांना काल राजीनामा द्यावा लागला. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड आहे.
तो धनंजय देशमुख यांचा निकटवर्तीय असल्यानेच मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे.
धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एन्ट्री होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
मात्र याच मुद्यावरून आता अंजली दमानिया यांनी तोफ डागली आहे. एक घाण गेली, दुसरी घाण येते हे दुर्दैवी आहे, अशा शब्दांत दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एन्ट्री होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यामध्ये यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.
डिसेंबर महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार
झाला, त्यावेळी छगन भुजबळ यांचा समावेश झाला नव्हता.
त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्याच वेळी छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा रंगली होती.
मात्र आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याने त्यांच्या जागी भुजबळ यांना मंत्रीमंडळात स्थान मिळू शकतं.
याच मुद्यावरून अंजली दमानियांनी रोखठोक भूमिका मांडली.
काय म्हणाल्या अंजली दमानिया ?
एक घाण गेली, दुसरी घाण येते हे दुर्दैवी आहे. ज्यांनी महाराष्ट्र सदनचा घोटाळा केला त्यांना मंत्रीपद कसं देऊ शकतात
असा सवाल अंजली दमानियांनी उपस्थित केला. एवढेच नव्हे तर, जर छगन भुजबळांना मंत्रीपद दिलं तर कोर्टात
जाऊन त्यांची बेल रद्द करण्याची मागणी करणार असल्याचेही दमानियांनी सांगितलं.
त्यामुळे छगन भुजबळांना मंत्रीपद मिळण्याच्या वाटेत मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यताही आहे.
गोरेंसारख्या व्यक्तीला मंत्रीमंडळातून काढून टाकलं पाहिजे
जयकुमार गोरेंसारख्या व्यक्तीला मंत्रीमंडळातून काढून टाकलं पाहिजे असं अंजली दमानिया म्हणाल्या.
पीडित महिलेसोबत आपण स्वतः राज्यपालांकडे जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.
विकृत व्यक्तींना मंत्रीमंडळात स्थान देऊ नका असी भूमिकाही दमानियांनी घेतली आहे.
मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात अंजली दमानिया अतिशय आक्रमर झाल्याचं पहायला मिळत आहे.
असा मंत्री जर मंत्रिमंडळात बसत असेल तर त्याला तिथून दूर करणे हे सरकारचं कर्तव्य आहे आणि अशा लोकांना
मंत्रिपदाची देण्याची काय गरज? चांगली लोकं सरकारला मिळत नाहीत का?
म्हणजे चांगली लोकं महाराष्ट्रात नाहीत का? का असे शोधून शोधून एक एक नग त्या मंत्रिमंडळात भरलेत मला तोच प्रश्न पडतोय असा सवालही अंजली दमानिया यांनी केला.
Read more here:
https://ajinkyabharat.com/dhananjay-munde-yancha-rajinamyacha-developed-chief-minister/