अकोला | प्रतिनिधी
श्रावण महिन्यात अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराज यांना जलाभिषेकासाठी गांधीग्राम
येथील पूर्णा नदीवरून जल नेण्यासाठी हजारो शिवभक्तांची यात्रा दरवर्षी आयोजित होते.
Related News
अकोल्यात माणुसकीचं दर्शन; महिला वाहतूक पोलिसांनी वाचवला जखमी कबुतराचा जीव
हसीन मस्तान मिर्झा: अंडरवर्ल्डच्या वारसाची सोशल मीडिया वर न्यायाची विनवणी
मोठी बातमी! Australiaत ज्यू धर्मीयांच्या कार्यक्रमात अंदाधुंद गोळीबार, दहा जणांचा मृत्यू
अक्षय खन्ना व विनोद खन्ना: बाप-मुलगा डान्सने सोशल मीडियावर गाजवले धुमाकूळ
किती महाग आहे अक्षय खन्ना याने ‘धुरंधर’ मध्ये घातलेला गॉगल ? कोणती कंपनी बनवते ?
अक्षय खन्नाचा ‘धुरंधर’ एण्ट्री व्हायरल; एक्स-गर्लफ्रेंड तारा शर्माची खास पोस्ट चर्चेत
5201314 : भारतात 2025 मध्ये लोकप्रिय झालेल्या संख्येचा अर्थ आणि ट्रेंड
सोशल मीडियावर फॅन पेजवरील फोटोवर प्राजक्ता चिडली; एआयच्या गैरवापराविरुद्ध स्पष्ट भूमिका
Rupal Tyagi Marriage 2025: आनंददायक लग्नाचे फोटो व्हायरल – चाहत्यांच्या उत्साहाला भरभराट
गेल्या 13 वर्षांनंतर नरनाळा महोत्सव यंदा पुन्हा, रस्त्यावरील निकृष्ट कामावर नागरिक संतप्त
200% टॅरिफची धमकी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या बैठकीनंतर भारत-अमेरिका व्यापारात खळबळ
जपान भूकंप: 10 फुटांच्या त्सुनामीचा इशारा, उत्तर भागात भीषण दहशत
यंदाही 28 जुलैपासून श्रावण महिना सुरू होत असल्याने, यात्रेपूर्वी गांधीग्राम घाट परिसरातील सुरक्षा व व्यवस्थापनाचा
आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सकाळी 10 वाजता भेट दिली.
या पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे,
उपविभागीय पोलीस अधिकारी, दहीहंडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे, शहर वाहतूक शाखेचे अधिकारी,
तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, आरोग्य विभाग,
ग्रामपंचायत अधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाहणीदरम्यान घाटावर बॅरिकेडिंग, रस्त्यांची स्वच्छता, पथदिवे, वाहतुकीची सोय,
जलस्तराची स्थिती याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शिवभक्तांना
कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असल्याची ग्वाहीही यावेळी देण्यात आली.
