अंबाजोगाई | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एक नवजात बाळ मृत घोषित केल्यानंतर दफनविधीवेळी जिवंत
असल्याचे उघड झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ७ जुलै २०२५ रोजी होळ
Related News
येथील एका महिलेस स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात बाळंतपणासाठी दाखल करण्यात आले होते.
प्रसव झाल्यानंतर डॉक्टरांनी बाळ मृत असल्याचे सांगितले. कुटुंबीयांनीही त्यावर विश्वास ठेवत दफनविधीची तयारी सुरू केली होती.
मात्र बाळाच्या आजीने शेवटचा चेहरा पाहण्याचा अट्टहास केला आणि बाळामध्ये हालचाल दिसून आली.
ही बाब लक्षात येताच परिसरात खळबळ उडाली.
नागरिकांकडून या निर्लज्ज आणि धोकादायक निष्काळजीपणाविरोधात संताप व्यक्त केला जात असून,
संबंधित डॉक्टरांवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/given-hospitality-and-honor/
