शेंदूरजन, प्रतिनिधी : ग्रामपंचायत शेंदूरजनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन आणि जागतिक पर्यावरण दिन विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी प्रकाश आढाव यांनी केले. त्यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विशद करताना सांगितले की, ६ जून १६७४ रोजी रायगडावर झालेला शिवराज्याभिषेक हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण होता. या घटनेमुळे जनतेमध्ये स्वाभिमान जागृत झाला आणि सर्वसामान्यांच्या हक्कांचे राज्य निर्माण झाले.
यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रत्येक नागरिकाने झाडे लावून ती जगविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले. पर्यावरण रक्षणासोबतच प्लास्टिकमुक्त गावाच्या संकल्पनेलाही चालना देण्यात आली. गावातील लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने ताट, पेले आणि वाट्या विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन वापरानंतर साहित्य जबाबदारीने परत करावे, असे आवाहन करण्यात आले.
Related News
राष्ट्रवादीचं मेगा प्लॅनिंग; सुनेत्रा पवारांचं रिलाँचिंग, 'आपल्या वहिनी आहेत ना!' कॅम्पेनची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आगामी काळातील राजकीय वाटचालीसाठी नव्या रणनीतीची आखणी सु...
Continue reading
Disha Salian मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका; म्हणाले, ‘मी त्यांना कधीही भेटलेलो नाही’
गेल्या सहा वर्षांपासून राजकीय हेतूने नाव जोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आदित्य...
Continue reading
जीआर आला! मराठा आरक्षणासाठी सरकारचा मोठा निर्णय; शिंदे समिती आणि मराठा आरक्षण कक्षासाठी नवी जागा
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि साम...
Continue reading
रुग्णालयांकडून वैद्यकीय वस्तूंवर मोठा नफा? Tukaram Mundhe यांच्या पत्रामुळे खळबळ; काही वस्तूंवर तब्बल २८४१ टक्क्यांपर्यंत फरक
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त
Continue reading
Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनामागे राजकीय शक्ती? आशिष शेलार यांच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी M...
Continue reading
शरद पवार मैदानात! ऐन गणेशोत्सवात राष्ट्रवादीची तातडीची बैठक; दुष्काळ, जरांगे आंदोलनावर होणार चर्चा
राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच
Continue reading
Disha Salian प्रकरणी सूरज पांचोलीच्या पोस्टनंतर जिया खानच्या आईची एण्ट्री; म्हणाल्या, ‘जियाच्या प्रकरणासारखाच प्रकार...’
Disha Salian Case: ...
Continue reading
Manoj Jarange Patil मुंबई आंदोलन : तिसऱ्या अर्जावर निर्णय रखडला; हायकोर्टात जाण्याची शक्यता, पोलिसांच्या विशेष बैठकीत काय घडलं?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी
Continue reading
मोठी बातमी! 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस सुपे घाटात उलटली; 4 ते 5 विद्यार्थी जखमी
बारामती : बारामती तालुक्यातील सुपे घाटात विद्यार्थ्यांना घ...
Continue reading
शिवसेना चिन्ह सुनावणी : शिंदे गटाच्या वकिलांचा भावनिक युक्तिवाद; ‘कार्यकर्ते हेच पक्षाचा प्राण’ म्हणत ठाकरे गटावर निशाणा
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत नीरज कौल यांचा जोरदार युक्त...
Continue reading
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी : उद्धव ठाकरेंना धक्का देणारा शिंदे गटाचा दावा; ‘पक्षप्रमुख’ पदावरून सर्वोच्च न्यायालयात मोठा युक्तिवाद
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्व...
Continue reading
17 खासदारांना मोठा झटका; भाजपने पक्षप्रवेशाची चर्चा फेटाळली, दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग
17 खासदारांना भाजपचा मोठा झटका : दिल...
Continue reading
कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी सदस्य खुशालराव शिंगणे, शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक नंदकिशोर शिंगणे, विठोबा शिंगणे, विनोद कोठारी, बाळू शिंगणे, भगवानराव शिंगणे, घनश्याम सरडे, साहेबराव लेंडगुते यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगविण्याची सामूहिक शपथ घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश शिंगणे, भगवान जाधव, राजू शिंदे, विष्णू डवके आणि पवन गवई यांनी विशेष परिश्रम घेतले. चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
read also : https://ajinkyabharat.com/draining-the-battery-of-a-mobile-phone-will-spoil-it-or-cause-death-stop-it-immediately-otherwise-you-will-suffer-loss/