राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन देणे,
महागाई भत्ता-घरभाडे भत्ता देणे, खाजगीकरण, सुधारीत जाचक
कार्यपद्धती रद्द करणे अशा विविध मागण्यासाठी राज्यातील एसटी
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. कालच एसटी कर्मचाऱ्यांनी
संपाची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक डेपोत
एसटी बसेस उभ्या राहिल्या असल्याचे दिसत आहे. पहाटेपासूनच या
संपाला एसटी कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. अकोला, अमरावती ,
अहमदनगर आणि धाराशिव जिल्ह्यातून एसटी बसेस डेपोमध्ये उभ्या आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना होत आहे.
पहाटेपासूनच एसटी स्थानकावर प्रवशांची गर्दी दिसून येत आहे.
अकोला मध्यवर्ती बसस्थानकावर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने अनेक
प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. परिणामी नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.
अनेक एसटी कर्मचारी सरकारविरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत.
काही ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी डेपोबाहेरच आंदोलन सुरू केल आहे.
त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात आपल्या प्रलंबित
मागण्यासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाल्याचे दिसत आहे.
विशेष बाब म्हणजे यापूर्वी 2021 मध्ये महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी दीर्घकालीन
संप पुकारला होता. तेव्हा तब्बल 54 दिवस एसटी बस थांबली होती. आता ऐन
गणेशोत्सव काळात लालपरीला ब्रेक लागणार असल्याने गणेशोत्सवासाठी
गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसह सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
7 सप्टेंबरपासून गणेशोत्सव राज्यभरात साजरा केला जाणारा आहे. त्याआधीच एसटी
कर्मचारी संघटनेने आंदोलन पुकारल्याने राज्यभरात नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे.
एसटीचे तिकीट बुक करून अनेकांनी गणेशोत्सवात गावी जाण्याचे नियोजन आखले आहे.
जर, संप जास्त दिवस सुरू राहिला तर नागरिकाना गावी जाता येणार नाही.
एस टी कामगारांची आर्थिक पिळवणूक थांबवावी यासाठी कामगारांनी राज्यभरात
निदर्शने करण्यास सुरूवात केली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/paralympics-indias-second-gold-medal/