राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन देणे,
महागाई भत्ता-घरभाडे भत्ता देणे, खाजगीकरण, सुधारीत जाचक
कार्यपद्धती रद्द करणे अशा विविध मागण्यासाठी राज्यातील एसटी
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. कालच एसटी कर्मचाऱ्यांनी
संपाची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक डेपोत
एसटी बसेस उभ्या राहिल्या असल्याचे दिसत आहे. पहाटेपासूनच या
संपाला एसटी कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. अकोला, अमरावती ,
अहमदनगर आणि धाराशिव जिल्ह्यातून एसटी बसेस डेपोमध्ये उभ्या आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना होत आहे.
पहाटेपासूनच एसटी स्थानकावर प्रवशांची गर्दी दिसून येत आहे.
अकोला मध्यवर्ती बसस्थानकावर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने अनेक
प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. परिणामी नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.
अनेक एसटी कर्मचारी सरकारविरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत.
काही ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी डेपोबाहेरच आंदोलन सुरू केल आहे.
त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात आपल्या प्रलंबित
मागण्यासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाल्याचे दिसत आहे.
विशेष बाब म्हणजे यापूर्वी 2021 मध्ये महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी दीर्घकालीन
संप पुकारला होता. तेव्हा तब्बल 54 दिवस एसटी बस थांबली होती. आता ऐन
गणेशोत्सव काळात लालपरीला ब्रेक लागणार असल्याने गणेशोत्सवासाठी
गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसह सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
7 सप्टेंबरपासून गणेशोत्सव राज्यभरात साजरा केला जाणारा आहे. त्याआधीच एसटी
कर्मचारी संघटनेने आंदोलन पुकारल्याने राज्यभरात नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे.
एसटीचे तिकीट बुक करून अनेकांनी गणेशोत्सवात गावी जाण्याचे नियोजन आखले आहे.
जर, संप जास्त दिवस सुरू राहिला तर नागरिकाना गावी जाता येणार नाही.
एस टी कामगारांची आर्थिक पिळवणूक थांबवावी यासाठी कामगारांनी राज्यभरात
निदर्शने करण्यास सुरूवात केली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/paralympics-indias-second-gold-medal/