अकोला जिल्ह्यात पावसामुळे पेरणीला सुरुवात, दहीगाव गावंडे परिसरात शेतकऱ्यांची लगबग

अकोला

अकोला, दि. : गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला वरुणराजा अखेर बरसल्याने अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरणी मोठ्या प्रमाणात लांबणीवर गेली होती. मात्र मागील दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे काही भागांमध्ये खरिपाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे.

अकोला तालुक्यातील दहीगाव गावंडे परिसरात शेतकरी ट्रॅक्टर तसेच पारंपरिक पद्धतीने पेरणी करताना दिसत आहेत. शेतशिवारात सध्या मोठी लगबग सुरू असून अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध ओलाव्याचा फायदा घेत पेरणी सुरू केली आहे.

तरीही कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य पावसाची खात्री झाल्याशिवाय पेरणी सुरू करू नये, असा सल्ला दिला आहे. जमिनीत किमान 3 ते 4 इंच ओलावा किंवा 70 ते 80 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, तसेच बियाणे योग्य खोलीवर म्हणजे तीन सेंमीपेक्षा जास्त खाली जाऊ नये याची काळजी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.

Related News

शेतकऱ्यांनी योग्य वाणाची निवड करूनच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/akot-rural-police-route-march-in-the-background-of-akot-breaking-moharamchaya/

Related News