नवी दिल्ली | 8 मे 2025 — जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर
भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर (PoK) येथील 9 दहशतवादी ठिकाणांवर
6-7 मेच्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत जोरदार हल्ले करून दहशतवाद्यांच्या गडांना लक्ष्य केले.
Related News
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा सन्मान; पॅरिसमध्ये प्रमाणपत्राची सोहळा
मराठा साम्राज्याचे शौर्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय राज्यका...
Continue reading
SJVN Limited शेअरमध्ये तुफान: गुंतवणूकदारांसाठी डिव्हिडंडसह परतावा
नवरत्न कंपनी एसजेव्हीएन लिमिटेडच्या (SJVN Li...
Continue reading
इयत्ता तिसरीपासून अभ्यासक्रमात एआयचा अंतर्भाव; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांची महत्त्वाची घोषणा
भारत बोधन एआय कॉनक्लेव...
Continue reading
सोनं पुन्हा चकाकलं! 10 ग्रॅमचा भाव आज एका दिवसात थेट पोहोचला…
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या बाजारात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत....
Continue reading
Ahmedabad Plane Crash : पायलटचा हात होता का? धक्कादायक दावा, सत्य लवकरच समोर येण्याची शक्यता
Ahmedabad : 12 जून 2025 रोजी Ahmedabad मध्ये झालेला व...
Continue reading
यवतमाळमध्ये पोलीस भरतीसाठी युवासेनेचा सामाजिक उपक्रम: नि:शुल्क निवास व भोजनाचे आयोजन
जिल्हा पोलीस दलाच्या यवतमाळ येथील दक्षता मैदानात ११ फेब्रुव...
Continue reading
राजपाल यादव ९ कोटींच्या कर्ज प्रकरणात अटक; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांकडून मदतीचा हात
हास्य अभिनेता राजपाल यादव यांचा दीर्घकाळ चाललेल्या ९ कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात अखेर ति...
Continue reading
घरच्या स्वयंपाकात रेस्टॉरंट स्टाइलची मजा – पनीर भरलेले दम आलू
भारतीय स्वयंपाकघरातला एक गोडवा, सौम्य मसाल्यांनी न्हाललेला आणि रुचकर पदार्थ म्हणजे
Continue reading
The 50 — OTT वर हिट ठरलेला रिऍलिटी शो; आता पर्यंत 26 स्पर्धकांना पराभव
बाणिज्य एशियाच्या ‘The 50 ’ ने JioHotstar वर 6.5 दशलक्षाहून अधिक दृश्यांसह प...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : दिव्या शिंदेची घराबाहेरची कहाणी; “त्यांनी मला निष्कासित केलं नाही, मी स्वतः बाहेर पडलं”
छोट्या पडद्यावरील नाट्यमय आणि वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
Continue reading
भारत-अमेरिका अंतरिम व्यापार करार: तेल खरेदीत मोठा बदल, रशियाला वळण?
अमेरिका आणि भारत यांच्यात अंतरिम स्वरूपाचा व्यापार करार झाल्याची माहिती स...
Continue reading
भारताच्या या अचूक आणि संयमित कारवाईला अमेरिका, फ्रान्स, इस्रायल आणि अनेक युरोपीय देशांनी पाठिंबा दर्शवला असून,
ही कारवाई दहशतवादविरोधी योग्य पावलं असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, तुर्किए, अज़रबैजान आणि कतार
या तीन प्रमुख मुस्लिम देशांनी पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेत भारताच्या कारवाईवर चिंता व्यक्त केली आहे.
तुर्किएची तीव्र प्रतिक्रिया
तुर्किएच्या परराष्ट्र मंत्रालयाने ‘एक्स’ (माजी ट्विटर) वर पोस्ट करत म्हटलं की,
“भारताच्या या कारवाईमुळे युद्धाचा धोका निर्माण झाला आहे. आम्ही भडकावू पावलं आणि नागरिक ठिकाणांवर हल्ले यांचं समर्थन करत नाही.
” त्यांनी दोन्ही देशांना संयम राखण्याचे आणि कूटनीतिक मार्गाने तोडगा शोधण्याचे आवाहन केले. भारताने मात्र स्पष्ट केलं आहे की,
कारवाई केवळ दहशतवादी तळांवरच झाली असून कोणत्याही नागरी किंवा सैन्य प्रतिष्ठानावर हल्ला करण्यात आलेला नाही.
अज़रबैजान आणि कतारचा संयमी विरोध
अज़रबैजाननेही भारताच्या कारवाईला आक्रमक ठरवत निंदा केली आहे.
त्यांनी पाकिस्तानातील नागरिकांच्या मृत्यूप्रकरणी दु:ख व्यक्त केलं.
याउलट कतारने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं असून,
शेजारी देश म्हणून शांततापूर्ण तोडगा शोधण्यावर भर दिला आहे.
पाकिस्तानचा आक्षेप आणि भारताची स्पष्टता
पाकिस्तानने ही कारवाई “युद्धाची घोषणा” असल्याचं सांगत तीव्र निषेध केला आहे.
त्यांनी यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघ आणि OICमध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
भारताने मात्र पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, या कारवाईत फक्त जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि
हिजबुल मुजाहिदीन यांच्या गडांना लक्ष्य केलं असून कोणतीही नागरी हानी भारताच्या कारवाईत झालेली नाही.
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sinduranantar-ankhi-a-motha-decision/