नंदकिशोर प्रांजळे
दहिगाव गावंडे गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा आता शेतीच्या कामात व्यस्त आहे.
या पावसामुळे पेरणीच्या कामांना वेग आला असून, ठिकठिकाणी शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Related News
दमदार पाऊस नसला तरी पेरणीयोग्य, चांगला पाऊस झाला आहे.
आतापर्यंत ५० टक्के पेरणी पूर्ण झाल्याचा अंदाज असून, यावर्षी कपाशीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
गेल्यावर्षी सोयाबीन पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे उत्पन्नात मोठी घट झाली.
शिवाय बाजारातही सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी भाव मिळाला.
तर अतिपावसामुळे शेंगा आल्या नसल्याने पुन्हा शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला.
त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दहिगाव गावंडे, पळसो, बहिरखेड रामगाव,
धोतरडी आदी गावांतील शेतकऱ्यांनी तूर व कपाशी या पिकांना अधिक पसंती दिली आहे.
काही शेतकऱ्यांनी खर्च कमी असल्याने सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/air-india-aircraft-accident/
