डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत समारंभ संपन्नराज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे कृषी पदवीधरांना मार्गदर्शन
अकोला, दि. ५ – डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत समारंभ आज भव्यदिव्य वातावरणात पार पडला.
या समारंभात ४,०४० विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.
Related News
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर दुचाकीवरून पळवून नेऊन अत्याचार
जिल्हा परिषदेचा कारभार रामभरोसेच!
अकोल्यात उन्हाचा तडाखा! तापमान ४४.२ अंशांवर, राज्यातील सर्वाधिक
माझोड – बाभुळगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खासदार अनुप धोत्रे यांचा पुढाकार;
भाऊसाहेब पोटे विद्यालयात NMMS पात्र गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा
‘सहकारातून समृद्धी’ योजनेतून सहकार चळवळीला नवे बळ – नानासाहेब हिंगणकर
सावता परिषदेच्या पातूर तालुका अध्यक्षपदी अजय ढोणे यांची निवड
आर्थिक विवंचनेत अडकलेल्या युवक शेतकऱ्याची आत्महत्या
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण,
तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी करावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाला राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, कर्नाटक कृषी मूल्य
आयोगाचे अध्यक्ष अशोक दलवाई, कुलगुरू डॉ. शरद गडाख, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, “ज्ञान मिळवणे ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी नव्या पदवीधरांनी
जबाबदारी घेतली पाहिजे.” त्यांनी विद्यापीठाच्या बीजनिर्मिती, पशुधन विकास, आदर्श ग्राम प्रकल्प अशा विविध उपक्रमांचे कौतुक केले.
कृषी मंत्री कोकाटे यांनी ‘एआय’सारख्या तंत्रज्ञानाच्या शेतीतील महत्त्वावर भर दिला. त्यांनी सांगितले की, ”
उत्पादनखर्च कमी करत उत्पन्न वाढवण्यासाठी नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे.”
यावेळी अशोक दलवाई यांनी कृषी संशोधनाची दिशा पर्यावरण संवर्धक असावी,
असे मत व्यक्त करत शाश्वत विकासासाठी जैवविविधता जतन, मृद व जलसंवर्धनाची आवश्यकता अधोरेखित केली.
या कार्यक्रमात कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकीसह विविध शाखांमधील २५ विद्यार्थ्यांना पीएच.डी.
पदवी प्रदान करण्यात आली. कुलगुरू डॉ. गडाख यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
READ MORE : https://ajinkyabharat.com/ya-deshchaya-netyavar-trump-yancha/