अकोला, दि. १० : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व यंत्रणांनी सजग
राहून दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करावे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवतानाच,
चुकीची माहिती, अफवा पसरणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसे आढळल्यास वेळीच खंडन करावे,
Related News
पातूर तालुक्यातील पिंपळडोळी, चिंचखेड आणि आलेगाव परिसरातील शेतकऱ्यांना सततच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे.
सोयाबीन बियाण्याची तीन वेळा पेरणी करूनही अतिवृष्टीमुळे ...
Continue reading
अकोट-अकोला रोडवरील देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.
हा अपघात 13 तारखेला रात्री घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो. मात्र अद्यापही अपघाता...
Continue reading
कोकणात पावसाने धुमाकूळ घातला असून रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
नदीकाठी असलेल्या वसाहतींना स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आ...
Continue reading
गेल्या तीन दशकापासून महाराष्ट्राच्या घराघरात शिव शाहू फुले आंबेडकर विचार पोहोचवणारे सामाजिक सामाजिक ब्रिगेडचे
प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर नुकताच अक्कलकोट येथे काही मा...
Continue reading
कुरणखेड (ता. बाळापूर) – पोटाची खडगी भरण्यासाठी मध्यप्रदेशातून आलेल्या 25 वर्षीय शेतमजुराचा
ताणखेड-खडका मार्गावर रात्रीच्या सुमारास दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. ...
Continue reading
अकोला - विदर्भ स्तरीय अभया एकल महिला चांदूर रेल्वे येथील साईबाबा ग्रामीण विकास संस्था,
वंचित विकास - पुणे, उदयकाळ फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत कौशल्य विकास प्रशिक्ष...
Continue reading
अडगाव बु. – सन 2024 च्या रब्बी आणि खरीप हंगामातील पिक विमा मंजूर होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात
अद्यापही विम्याची रक्कम जमा न झाल्याने, शेतकरी संघटनेने कृषी अधिक्षक शंकर किरवे यांना...
Continue reading
अकोट
समाजातील विविध क्षेत्रात अविरत पणे कार्य करीत असलेल्या रोटरी क्लब ऑफ अकोट चा वर्ष २०२५-२०२६ करिता
शपथविधी समारोह मोठ्या उत्साहात डिस्टिक्ट ३०३० च्या प्रमुख अधिकाऱ्यांच्य...
Continue reading
अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाईसाठी "ऑपरेशन प्रहार" मोहीम पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे.
या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे जुने...
Continue reading
वरळी डोम येथील मेळाव्यात केलेल्या “मारहाण करतानाचा व्हिडीओ काढू नका” या वक्तव्यावरून
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात महाराष्ट्र DGPकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
त्रिभाषा...
Continue reading
अकोला शहराचे आराध्य दैवत श्रीराजराजेश्वर मंदिरात आज हिंदी भाषिकांच्या श्रावण महिन्यातील
पहिल्या सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली;
तसेच शेकडो कावडयात्रींनी जलाभिषे...
Continue reading
श्रावण महिन्यातील पहिली संकष्टी चतुर्थीला अकोला पासून सुमारे १६ ते १७ किमी अंतरावर असलेल्या गायगाव
येथील गणपती मंदिरात श्री गणेश भक्तांची मोठी गर्दी जमते.
आजही अकोल्यातील शेक...
Continue reading
असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज दिले.
सदयस्थितीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेले निर्देश आणि मान्सूनपूर्व तयारीचा आढावा
घेण्यासाठी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
सहाय्यक पोलीस अधीक्षक अमल मित्तल, महापालिका आयुक्त सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी
तथा उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे, सर्व उपविभागीय अधिकारी , सर्व तहसीलदार ,
कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम , जिल्हा शल्य चिकीत्सक , जिल्हा आरोग्य अधिकारी ,
सर्व नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह सर्व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री अजित कुंभार म्हणाले की, सर्व यंत्रणांनी परस्परांशी सातत्यपूर्ण समन्वय ठेवावा.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी वायरलेस यंत्रणा, २४ बाय ७ नियंत्रण कक्ष व सर्व सुरक्षा यंत्रणा ’अलर्ट’ ठेवाव्यात.
चुकीची माहिती मिळून कुठेही अव्यवस्था निर्माण होता कामा नये. अफवा पसरू नयेत याची खबरदारी घ्यावी.
अधिकृत संदेश व संकेतस्थळाबाबत नागरिकांची जाणीवजागृती करावी.
जिल्ह्यात मान्सूनपूर्व नालेसफाई आदी कामे महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांनी विहित मुदतीत पूर्ण करावी.
रुग्णालये, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, निवारा केंद्रे, आरोग्य केंद्रे सुसज्ज ठेवावी. पुरेसा औषध साठा ठेवावा.
सर्वत्र पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा. दूषित पाणी, अस्वच्छता, रोगराई पसरू नये यासाठी उपाययोजना कराव्यात.
हवामान खात्याकडून येणा-या सूचना सर्वदूर प्रसारित व्हाव्यात. जलप्रकल्पांच्या ठिकाणी आवश्यक सर्व दुरुस्ती वेळेत पूर्ण कराव्यात.
आरोग्य विभाग, नगरपालिका, महानगरपालिका, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी
यंत्रणांनी नियंत्रण कक्ष सुरू करून जिल्हा नियंत्रण कक्षाशी समन्वय ठेवावा.
नदी नाल्याच्या प्रवाहास अडथळा असलेले अतिक्रमण काढणे, घनकचरा व्यवस्थापन, संभाव्य धोका टाळण्यासाठी
वाळलेली झाडे विहित प्रक्रिया पूर्ण करून तोडणे आदी बाबींची वेळेत पूर्तता करावी,
असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. अजित कुंभार यांनी दिले आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/mission-sinduramadhye-300-jawan-sarahdhadi/