सतना (मध्य प्रदेश) :
जिथे देश झोपलेला असतो, तिथे चूंद गावाचे जवान सरहद्दीवर जागे असतात.
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील लहानसं चूंद गाव आज देशासाठी अभिमानाचं प्रतीक ठरतंय.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
फक्त 4700 लोकसंख्या असलेल्या या गावातील 500 हून अधिक लोक सैन्यात आहेत,
तर 300 जवान सध्या प्रत्यक्ष सीमेवर मिशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या नापाक कारवायांना प्रत्युत्तर देत आहेत.
या गावाच्या प्रत्येक घराचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे भारतीय लष्कराशी संबंध आहे. कोण नेव्हीत आहे,
कोण एअरफोर्समध्ये, तर कोण स्पेशल कमांडो युनिटमध्ये कार्यरत आहे. इथल्या मातांचे स्वप्न मुलांना वर्दीत
पाहण्याचं असतं आणि मुलंही “भारत माता की जय” च्या घोषणांमध्ये देशभक्तीने मोठी होतात.
सात पिढ्यांची शौर्यपरंपरा
चूंद गावाच्या मातीला वीरांचा सुगंध लाभला आहे. दुसऱ्या महायुद्धापासून कारगिल युद्ध आणि आता मिशन सिंदूरपर्यंत,
या गावाने सात पिढ्यांतून सैन्यात सेवा दिली आहे. गावात शहीद समर बहादुर सिंह, शहीद कन्हैया लाल सिंह
आणि शहीद बाबूलाल सिंह यांचे स्मारक आजही त्यांच्या बलिदानाची साक्ष देतात.
मिशन सिंदूर सुरु होताच जवान पुन्हा मोर्चावर
अलीकडेच काही जवान सुट्टीवर गावात आले होते. पण मिशन सिंदूर सुरु झाल्याचे आदेश मिळताच,
त्यांनी एकही क्षण न गमावता सरळ मोर्चाकडे प्रस्थान केलं. गावातील महिलाही आपल्या पती,
भाऊ आणि मुलांच्या शौर्यावर अभिमान बाळगतात. त्यांच्या डोळ्यात चिंता असली तरी हृदयात देशासाठीची निष्ठा कायम असते.
निवृत्त जवानांचा देखील जोश कायम
गावातील निवृत्त जवान देखील आजही म्हणतात, “जर सरकारने पुकारा दिला,
तर आम्ही पुन्हा बंदूक उचलायला तयार आहोत.” ही देशभक्तीच चूंद गावाला ‘वीर सपूतांची भूमी’ बनवते.
Read Also : https://ajinkyabharat.com/india-pakistan-ceasefire-agreed-trump-yancha-motha-claim/