सतना (मध्य प्रदेश) :
जिथे देश झोपलेला असतो, तिथे चूंद गावाचे जवान सरहद्दीवर जागे असतात.
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील लहानसं चूंद गाव आज देशासाठी अभिमानाचं प्रतीक ठरतंय.
Related News
दोन बैलांच्या भयंकर झुंजीत तरुणींची स्कूटी घुसली; पुढे जे घडलं ते पाहून बसणार जबरदस्त धक्का!सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. काह...
Continue reading
मोगऱ्यापासून हिबिस्कसपर्यंत : उन्हाळ्यातील ताजेतवाने फुलांचे ६ नैसर्गिक पेय
मोगऱ्यापासून हिबिस्कसपर्यंत; उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी 6 फुलांची...
Continue reading
सहारा वाळवंटात मृत्यूचा सापळा; ट्रक बंद पडल्याने 50 भाविकांचा करुण अंत, दोन जणांचा चमत्कारिक बचावआफ्रिका खंडातील सहारा वाळवंटातून एक अत्यंत हृदयद्राव...
Continue reading
जून महिना खरोखरच बदलू शकतो का तुमचे प्रेमजीवन? ‘June Theory’मागील सत्य काय सांगते?
June Theory : प्रत्येक वर्षाची सुरुवात होताच लोक नवीन संकल्प करतात. काहीजण फिटनेसचे ध्येय ठेवतात...
Continue reading
झटपट आणि चविष्ट कम्फर्ट मील: Burnt Garlic Noodles ची वाढती लोकप्रियता
घरच्या घरी काही मिनिटांत तयार होणारा स्वादिष्ट पदार्थ; प्रत्येक नूडल्स प्रेमीसाठी खास पर्यायआजच्या धावपळी...
Continue reading
अकोला GMCH मध्ये धक्कादायक घटना: पाठीवर पती, हातात लहान मूल आणि पोटाला बॅग घेऊन पत्नीची रुग्णालयात संघर्षमय धावपळ
अकोला जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद...
Continue reading
चहा जास्त कडक आणि कडू झाला? फेकू नका; या सोप्या उपायांनी चवदार बनवा
चहा हा भारतासह जगभरातील कोट्यवधी लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सकाळची सु...
Continue reading
हॉर्मुज सामुद्रधुनीत अमेरिका-इराण आमनेसामने
US-Iran Update : हॉर्मुजमध्ये इराणचे ड्रोन पाडत अमेरिकेचा जोरदार पलटवार; आखातातील तणाव पुन्हा शिगेला
अमेर...
Continue reading
मोठी बातमी! महाविकास आघाडीत फूट पडण्याचे संकेत? काँग्रेसकडून थेट मविआतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव, राजकारणात खळबळ
राज्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी आण...
Continue reading
Gullak 5 Review : गीतेजली कुलकर्णी ठरली सीझनची खरी हिरो; मिश्रा कुटुंब पुन्हा जिंकते प्रेक्षकांची मने
Continue reading
फक्त 4700 लोकसंख्या असलेल्या या गावातील 500 हून अधिक लोक सैन्यात आहेत,
तर 300 जवान सध्या प्रत्यक्ष सीमेवर मिशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या नापाक कारवायांना प्रत्युत्तर देत आहेत.
या गावाच्या प्रत्येक घराचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे भारतीय लष्कराशी संबंध आहे. कोण नेव्हीत आहे,
कोण एअरफोर्समध्ये, तर कोण स्पेशल कमांडो युनिटमध्ये कार्यरत आहे. इथल्या मातांचे स्वप्न मुलांना वर्दीत
पाहण्याचं असतं आणि मुलंही “भारत माता की जय” च्या घोषणांमध्ये देशभक्तीने मोठी होतात.
सात पिढ्यांची शौर्यपरंपरा
चूंद गावाच्या मातीला वीरांचा सुगंध लाभला आहे. दुसऱ्या महायुद्धापासून कारगिल युद्ध आणि आता मिशन सिंदूरपर्यंत,
या गावाने सात पिढ्यांतून सैन्यात सेवा दिली आहे. गावात शहीद समर बहादुर सिंह, शहीद कन्हैया लाल सिंह
आणि शहीद बाबूलाल सिंह यांचे स्मारक आजही त्यांच्या बलिदानाची साक्ष देतात.
मिशन सिंदूर सुरु होताच जवान पुन्हा मोर्चावर
अलीकडेच काही जवान सुट्टीवर गावात आले होते. पण मिशन सिंदूर सुरु झाल्याचे आदेश मिळताच,
त्यांनी एकही क्षण न गमावता सरळ मोर्चाकडे प्रस्थान केलं. गावातील महिलाही आपल्या पती,
भाऊ आणि मुलांच्या शौर्यावर अभिमान बाळगतात. त्यांच्या डोळ्यात चिंता असली तरी हृदयात देशासाठीची निष्ठा कायम असते.
निवृत्त जवानांचा देखील जोश कायम
गावातील निवृत्त जवान देखील आजही म्हणतात, “जर सरकारने पुकारा दिला,
तर आम्ही पुन्हा बंदूक उचलायला तयार आहोत.” ही देशभक्तीच चूंद गावाला ‘वीर सपूतांची भूमी’ बनवते.
Read Also : https://ajinkyabharat.com/india-pakistan-ceasefire-agreed-trump-yancha-motha-claim/