अकोट तालुक्यातील गावांमध्ये रस्त्यांच्या समस्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ग्रामशेतरस्ता समित्या स्थापन कराव्यात,
अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
Related News
“भारताच्या अटींवरच उत्तर मिळेल; ऑपरेशन सिंदूरनंतर आदमपूरवरून मोदींचा संदेश”
“सरन्यायाधीशांच्या मातोश्रींचा स्पष्ट सूर : ‘बॅलेट पेपरच सुरक्षित, मतदारांचा विश्वास जपणं गरजेचं'”
दहावी नापास? चिंता नको! आता अकरावीमध्ये प्रवेशाचा मार्ग खुला
महागाईने झोप उडवली! वाढलेल्या दरांमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले, प्रवासही महागला
देशविरोधी बोललं तर बाय-बाय!” – पाकिस्तानी कलाकारांना भारतातून हद्दपार करण्याचा निर्णय
जिवंत विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने ३ जनावरांचा मृत्यू;
वैशाख पोर्णिमेच्या लख्ख प्रकाशात काटेपूर्णा अभयारण्यात प्राणी गणना
मान्सून अंदमानात दाखल! महाराष्ट्रात ६ जूनला होणार एंट्री
शोपियांमध्ये पहाटे अतिरेकी चकमक
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड
CBSE बारावी निकाल जाहीर,
“दहावीचा निकाल जाहीर,
महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे अध्यक्ष शरद पवळे,
राज्य समन्वयक दादासाहेब जंगले आणि अकोट तालुका कृती समिती सदस्य यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी,
पंचायत समिती अकोट यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
शासन निर्णयाची त्वरित अंमलबजावणी गरजेची
ग्रामपंचायत स्तरावर ग्रामशेतरस्ता समित्या स्थापन करून त्या गावातील रस्त्यांच्या देखभालीसाठी
कार्यरत करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात ११ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन निर्णय जारी केला आहे.
त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने आराखडा तयार करून ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक आहे.
मात्र, अनेक गावांमध्ये ही समिती अद्याप कार्यान्वित झालेली नाही, त्यामुळे रस्त्यांवर मालकी हक्कासंदर्भात वाद वाढत आहेत.
७ दिवसांत समित्या स्थापन कराव्यात – शेतकऱ्यांची ठाम भूमिका
शेतकऱ्यांच्या रस्त्यांसंबंधीच्या समस्या गाव पातळीवरच सोडविण्यासाठी ग्रामशेतरस्ता समिती स्थापन करावी,
अशी मागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील सर्व गावांमध्ये ही समिती
स्थापन झाल्यास शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागतील आणि ग्रामविकास प्रक्रियेला वेग मिळेल.
शासनाने यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने करण्यात आली आहे.