चोहोटा बाजार परिसरातील पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना – आमदार सावरकर
अकोट तालुक्यातील चोहोटा बाजार परिसर आणि आसपासच्या गावांमध्ये पाणीटंचाई गंभीर बनली असून,
नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. करोडी गावातील उपसरपंच
मंगेश घुले यांनी या समस्येची वारंवार तक्रार केली होती,
Related News
सततच्या पावसामुळे तीन वेळा पेरणी वाया; शेतकऱ्यांचा आक्रोश, नुकसानभरपाईची मागणी
देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक;
कोकणात मुसळधार पावसाचा हाहाकार;
प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडने नोंदविला अकोल्यात निषेध.
मध्यप्रदेशातून पोटाची खडगी भरण्यासाठी आलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू; कुरणखेडमध्ये हळहळ
विदर्भ स्तरीय अभया परिषद उत्साहात संपन्न, कार्यकर्ता तुषार हांडे सन्मानित.
पिकविमा मंजूर तरीही थकलेली रक्कम; शेतकऱ्यांचा संताप, कृषी अधिक्षकांना निवेदन
अकोट रोटरी क्लब चा शपथग्रहण सोहळा संपन्न
“ऑपरेशन प्रहार”ची मोठी कारवाई: अकोल्यात जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांवर कारवाई, ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
राज ठाकरे अडचणीत? वरळीतील वक्तव्यावरून DGPकडे तक्रार दाखल
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
मात्र अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नाही.
ग्रामस्थ आणि सरपंचांच्या तक्रारीची दखल घेत आमदार रणधीर सावरकर यांनी बुधवारी
जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने पाणीपुरवठ्याच्या समस्येचे निराकरण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
अकोट वरून होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने
अनेक गावांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणी पोहोचत नाही.
चोहोटा बाजार परिसरातील नागरिक संपूर्णतः
जीवन प्राधिकरणच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहेत.
त्यामुळे हा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी नागरिकांनी केली असून,
आमदार सावरकर यांनीही जलसंपत्ती विभागाला तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले आहे.