राजसमंद (राजस्थान) | ता.
१६ एप्रिल — राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील देलवाडा परिसरात आज एक भीषण अपघात झाला.
वरात घेऊन जाणारी एक खासगी बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली.
Related News
सात महिने जुनी तक्रार दुर्लक्षित! मयुरीच्या आईने महिला आयोगाला लिहिलं होतं पत्र
“फायदा करून देणार 100 टक्के…”
EPFO चा 7 कोटी सदस्यांना गिफ्ट;
कान 2025 : आलिया भट्टच्या ड्रेसची मल्लिका शेरावतच्या गाऊनशी तुलना;
पुण्यातील बनावट कॉल सेंटरवर मोठी कारवाई;
“केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियासारखे एकत्र काम केल्यास कोणतंही उद्दिष्ट कठीण नाही”
अकोट तालुक्यात परवानाधारक दुकानदारांना जून ते ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य उपलब्ध;
किरीट सोमय्या हेच एक भोंगा – हर्षवर्धन सपकाळ….
हवामान खात्याकडून मान्सूनचा – डबल अटैक जारी !
21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पुन्हा एकदा सतर्कतेची गरज!
15 वर्षांनंतर सर्वात लवकर आगमन
‘महाबीज’तर्फे बीटी कापूस व तूर बियाण्याच्या नव्या वाणांचे लोकार्पण;
या भीषण अपघातात किमान १५ जण जखमी झाले असून,
त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.
ही घटना आज (१६ एप्रिल) सकाळी घडली. बसमध्ये लग्न समारंभासाठी निघालेले वऱ्हाडी प्रवासी होते.
देलवाडा मार्गावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली.
धडकेनंतर बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली.
अपघात इतका भीषण होता की बस आणि ट्रकचे पुढचे भाग अक्षरशः चकणाचूर झाले.
गंभीर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल
अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले.
सर्व जखमींना जवळील राजसमंद जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
४ ते ५ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरू आहेत.
अपघाताचे नेमके कारण अस्पष्ट
अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ट्रकचा चालक नियंत्रण गमावल्यामुळे हा अपघात
घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत अपघाताच्या कारणांवर स्पष्टता येणार नाही.
स्थानिक नागरिकांत संताप
घटनास्थळावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
अपघाताच्या वारंवार होणाऱ्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.
या मार्गावर अति वेग आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन हे मोठं संकट बनलं आहे,
असं नागरिकांचं म्हणणं आहे.