संग्रामपूर प्रतिनिधी-
वारी हनुमान येथील डोहात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज 11 जुलै रोजी दुपारी 2.30
वाजताचे सुमारास घडली. मृतक युवकाचे नाव अक्षय सिध्दार्थ भोजने रा. तेल्हारा असे आहे.
Related News
यासंदर्भात वृत्त असे की, मयत नामे अक्षय सिध्दार्थ भोजने वय 23 वर्ष रा.तेल्हारा हा 11 जुलै रोजी सकाळी 10
वाजताच्या सुमारास त्याचे मित्र नामे 1. प्रेम महेंद्र डोंगरे 2. रवीद्र गजानन पोहरकार 3. राहुल रविद्र विरघट सर्व
रा तेल्हारा यांच्यासोबत दर्शनासाठी ग्राम वारी हनुमान मंदीर येथे गेले होते. दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास वारी
हनुमान मंदीराजवळील आड नदीतील राजना डोहामध्ये अक्षय सिध्दार्थ भोजने व त्याचे मित्र हे पोहण्यासाठी गेल होते.
पोहत असतांना अक्षय भोजने याने उंची वरून पाण्यात उडी मारल्याने त्याच्या डोक्याला मार लागुन तो पाण्यात बुडाला व बाहेरच आलाच नाही.
घटनेचे वृत्त कळताच वारी ग्रामस्थानीं त्याचा पाण्यामध्ये शोध घेतला असता त्यांना तो पाण्यामध्ये मृत अवस्थेत मिळुन आल्याने त्याला बाहेर काढले.
अशा फीर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरुन मा ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने सदरचा मर्ग दाखल करून तपासकामी पोहेकों शाकीर
पटेल बन 1634 यांच्याकडे देण्यात आला. याप्रकरणी मयत याचा भाऊ अनमोल सिध्दार्थ भोजने वय 33 वर्षे रा. तेल्हारा जि. अकोला
यांनी सोनाळा पोस्टेला दिलेल्या फिर्यादीवरून कलम 194 भान्यासुसं मर्ग दाखल करण्यात आला आहे.
