अकोला | ता. १७ एप्रिल —
अकोल्यात पाणी प्रश्नाने उग्र रूप घेतलं असून शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली आहे.
शहरात सुरु असलेल्या पाण्याच्या टंचाईविरोधात आज महापालिकेच्या जलप्रदाय विभागात
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
शिवसैनिकांनी जोरदार घागर आंदोलन केलं. या दरम्यान संतप्त शिवसैनिकांनी विभागात घुसून तोडफोड केली,
खुर्च्या फेकल्या आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचा जोरदार निषेध नोंदवला.
सध्या अकोला शहराला पाच दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
विशेषतः मलकापूर भागात पाणी मिळत नसल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही भागांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे देखील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
या पाणी प्रश्नावरून आज माजी नगरसेवक मंगेश काळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या
कार्यकर्त्यांनी घागर मोर्चा काढत महापालिकेच्या जलप्रदाय विभागावर धडक दिली.
घोषणाबाजी करत शिवसैनिक विभागात घुसले आणि तिथे खुर्च्या, फर्निचर यांची तोडफोड केली.
मुख्य मागणी – दररोज पाणीपुरवठा
या आंदोलनामागची मुख्य मागणी म्हणजे मलकापूर भागात दररोज नियमित पाणीपुरवठा करणे.
मंगेश काळे यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं की, “नागरिकांना दररोज स्वच्छ पाणी मिळणं ही त्यांची मूलभूत गरज आहे.
जर प्रशासन वेळेवर जागं झालं नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.”
मंगेश काळे यांचा बाईट :
“पाणी ही गरज आहे, लक्झरी नाही! आम्ही वारंवार मागण्या करूनही प्रशासन झोपलेलं आहे.
आता आम्ही झोपवणार नाही. मलकापूरला दररोज पाणी मिळालंच पाहिजे!”
Read Also : https://ajinkyabharat.com/kolhaparat-football-samanyadrammanya-ayonatanana-pach-thousand-penalty-penalty/