मेरठ (उत्तर प्रदेश) | ता.
१६ एप्रिल २०२५ — उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातील ब्रह्मपुरी पोलीस ठाणे हद्दीतून एक
धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. अजीम नावाच्या एका तरुणाने
Related News
‘सगळं हवेतच उडवलं जाईल’; ट्रम्प यांची घोषणा –
नाशिकच्या जिंदाल कंपनीत सलग तिसऱ्या दिवशीही भीषण आग;
धक्कादायक! हडपसरमध्ये 22 वर्षीय विवाहितेचा हुंड्यासाठी छळ;
अकोल्याच्या पोलीस अधीक्षकपदावर बदल:
अकोल्यात मुसळधार पावसाचा कहर :
कालपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू :
अकोल्यात घिरट्या घालणाऱ्या विमानाचा उलगडा;
अकोल्यात प्री-मान्सून पावसाचा जोर;
अकोल्यात इंदिरा गांधींच्या पुतळ्याची विटंबना;
अकोला- जिल्ह्यात पावसाचा कहर, कांदा सह तीळ पिकांचे नुकसान
ज्योती मल्होत्रा ची खरी ओळख काय?
अकोल्यात विवाहसोहळ्यात ‘गौसेवे’चा अनोखा उपक्रम :
आपल्या भावाकडून आणि वहिनीकडून फसवणूक झाल्याचा आरोप करत न्यायासाठी एसएसपी कार्यालय गाठलं.
विशेष म्हणजे, अजीम याचं लग्न जबरदस्तीने त्याच्यापेक्षा तब्बल
२५ वर्षांनी मोठ्या असलेल्या विधवा महिलेशी लावल्याचा आरोप त्याने केला आहे.
‘मुलीशी लग्न आहे’ म्हणून फसवणूक
तारापुरी भागात राहणारा अजीम हा आपल्या मोठ्या भाऊ नदीम आणि वहिनी शायदा यांच्यासोबत राहतो.
अजीमच्या सांगण्यानुसार, ईदच्या दिवशी म्हणजेच ३१ मार्च रोजी त्याची वहिनी शायदा हिने त्याला फाजलपूर येथे बोलावले.
तिथे आपल्या बहिणीच्या मुलीशी म्हणजेच मंतशा हिच्याशी लग्न लावून दिलं जाईल, असं सांगण्यात आलं.
अजीमने विश्वास ठेवत लग्नासाठी होकार दिला.
निकाहच्या वेळी समजलं कटकारस्थान
संध्याकाळी फाजलपूरच्या मोठ्या मशिदीत निकाहाची तयारी सुरू असताना, मौलवींनी निकाह वाचण्याआधी
अजीमला समजलं की त्याचं लग्न मंतशाशी नव्हे, तर तिच्या आईशी —
ताहिरा ह्या २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी लावलं जात आहे.
हे ऐकून अजीमने जोरदार विरोध केला.
धमक्या, मारहाण आणि ब्लॅकमेलिंग
अजीमचा आरोप आहे की त्याने विरोध करताच त्याचे भाऊ नदीम,
वहिनी शायदा आणि इतर नातेवाईकांनी त्याच्यावर शारीरिक हल्ला केला
आणि गप्प बसण्याची धमकी दिली. एवढंच नव्हे, तर जर त्याने कोणाकडे तक्रार केली,
तर त्याच्यावर खोट्या बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला जाईल, अशीही धमकी दिली गेली.
एसएसपी कार्यालयात न्यायासाठी धाव
या सगळ्या प्रकारानंतर अजीमने बुधवारी मेरठ येथील वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP)
कार्यालय गाठून एक सविस्तर निवेदन सादर केलं.
त्याने या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/rajasthanam/