पश्चिम महाराष्ट्रातील भाजप मंत्री जयकुमार गोरे यांवर अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप आहे.
काँग्रेस नेत्यांनी केलेल्या या आरोपांना गोरे यांनी खंडन केले आहे.
ते म्हणाले की, 2017 च्या एका प्रकरणात कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्त केले आहे.
त्यांनी आरोप करणाऱ्यांवर हक्कभंग आणण्याचा इशारा दिला आणि राजकीय विरोधकांवर टीका केली आहे.
Related News
PIN शिवाय पेमेंटची नवी क्रांती; बायोमॅट्रिक फीचरमुळे बँकिंग अधिक सुरक्षित आणि वेगवान
PIN शिवाय पेमेंटची नवी क्रांती : डिजिटल ...
Continue reading
सावधान! उन्हाळ्यात ऊसाचा रस पिताय? डॉक्टरांचा मोठा इशारा; आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो
उन्हाळा सुरू झाला की शरीराला थंडावा देणाऱ्या पेयांची मागणी व...
Continue reading
लग्नाआधी फिट दिसण्यासाठी Arti Singhचा साधा पण कठोर डाएट प्लॅन; २० दिवसांत ५ किलो वजन घटवण्याचा दावा
टीव्ही अभिनेत्री Arti Singh हिने तिच्या लग्नाआध...
Continue reading
Natasha Poonawalla चा स्टनिंग लूक व्हायरल; मोगा सिल्क साडीमध्ये ‘कांथा’ कलेला दिला नवा आयाम
फॅशनमध्ये पुन्हा एकदा नवा ट्रेंड सेट
बॉलिवूड आणि फॅशन वर्तुळात नेहमीच आपल्या हटके स्टा...
Continue reading
प्रसिद्ध युट्यूबरच्या घरात धक्कादायक प्रकार; कूकच्या घृणास्पद कृत्याचा CCTV फुटेज व्हायरल
सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले युट्यूबर लखन अर्जुन रावत आणि त्यांची पत्नी नीतू बिष्ट सध्या...
Continue reading
गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली हो
पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे मंत्री जयकुमार गोरे सध्या मोठ्या वादात सापडले आहेत.
त्यांनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप करण्यात येत आहे.काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार
संजय राऊत यांनी त्यांच्यावर हे आरोप केले असून त्यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.
वडेट्टीवार आणि राऊत यांच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील तसेच अंजली दमानिया यांनी गोरेंवर कडाडून टीका केली.
विरोधी पक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात येत आहे. याच सर्व आरोपांच्या,
घटनांच्या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडत प्रतिक्रिया दिली.
2017 साली एक गुन्हा दाखल झाला होता.
2017 साली विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा नगरपालिकेची निवडणूक होती.
त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस आधी माझ्यावर एक गुन्हा दाखल झाला होता.
आणि त्यावर ट्रायल होऊन 2019 साली त्याचा निकाल लागला. त्याच निकालाची प्रत माझ्यासोबत आहे,
त्यामध्ये कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं आहे. जप्त केलेला मुद्देमाल, मोबाईल हे नष्ट करण्याचा आदेश कोर्टाने त्याचवेळी दिला होता.
आपली कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्याचा पुनरुच्चार जयकुमार यांनी केला.
माझी बदनामी करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार आहे, असं जयकुमार गोरे म्हणाले.
या देशात लोकशाही आहे, आपल्या समोर सर्वोच्च न्यायलय आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालाला ( 2019) आता सहा वर्ष झाली आहेत.
आज सहा वर्षांनंतर हा विषय पुन्हा समोर आला आहे. आपण कुठल्या वेळी कोणता विषय समोर आणावा,
याबद्दल राजकीय नेत्यांनी मर्यादा ठेवली पाहिजे, असं मला वाटत. माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातल्या युवकाने,
ज्या वडिलांनी कष्ट करून मोठं केलं, इथपर्यंत पोहोतचवलं, त्यांच्या मृत्यूनंतर मला त्यांचं अस्थिविसर्जन सुद्धा करू दिलं नाही.
एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण विरोधकांनी करावं हे मला अपेक्षित नव्हतं.
या घटनेचा कोर्टाने निकाल दिलेला आहे, आणि या संदर्भात ज्यांनी ज्यांनी आरोप केला आहे,
त्या प्रत्येकावर सभागृहात हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असल्याचे गोरे यांनी नमूद केलं,
त्या लोकांना कोर्टात खेचणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.